शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे ‘टार्गेट ५१ टक्के’: चंद्रशेखर बावनकुळे

By योगेश पांडे | Updated: September 14, 2025 20:59 IST

विरोधकांच्या आरोपांना मोडून काढण्याचे आव्हान : कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून जागोजागी आवाहन

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपने प्रत्येक मतदारसंघात किमान ५१ टक्के मते मिळविण्याचे टार्गेट ठेवले आहे. या दृष्टीने जागोजागी कार्यकर्ता संवाद मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपींना मोडून काढण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्याच दृष्टीने पक्षाच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना त्यासंदर्भातील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.नागपूर जिल्ह्यातील महादुला व बहादुरा भागात भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला किमान ५१ टक्के मते मिळतील या अनुषंगाने काम करा आणि पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पक्षाला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. जे वचन मी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते मी पूर्ण करणार आहे. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार आहे. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते महिलांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी घरोघरी भेट द्या, असे बावनकुळे यांनी सांगितले. जो जिंकून येऊ शकतो आणि जनतेच्या पसंतीचा असलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, चेतन खडसे, हरीश कंगाली, ब्रम्हा काळे, राजेश रंगारी इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सुनिल केदारांवर हल्लाबोल

यावेळी बावनकुळे यांनी कॉंग्रेस नेते सुनिल केदार यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेस मत चोरीचा आरोप करीत आहे. परंतु ज्यांनी शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये खाल्ले व जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी केला. कॉंग्रेसने कामठीमध्ये मोर्चा काढला. मात्र त्या ठिकाणी मी ९५ पैकी ७५ बुथवर मागे होतो. मग मतचोरी कोणी केली, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस पक्ष खोटा अजेंडा राबवित आहे. ते खोडून काढा, त्यांना उत्तर द्या असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा