शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे ‘टार्गेट ५१ टक्के’: चंद्रशेखर बावनकुळे

By योगेश पांडे | Updated: September 14, 2025 20:59 IST

विरोधकांच्या आरोपांना मोडून काढण्याचे आव्हान : कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून जागोजागी आवाहन

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपने प्रत्येक मतदारसंघात किमान ५१ टक्के मते मिळविण्याचे टार्गेट ठेवले आहे. या दृष्टीने जागोजागी कार्यकर्ता संवाद मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपींना मोडून काढण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्याच दृष्टीने पक्षाच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना त्यासंदर्भातील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.नागपूर जिल्ह्यातील महादुला व बहादुरा भागात भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला किमान ५१ टक्के मते मिळतील या अनुषंगाने काम करा आणि पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पक्षाला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. जे वचन मी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते मी पूर्ण करणार आहे. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार आहे. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते महिलांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी घरोघरी भेट द्या, असे बावनकुळे यांनी सांगितले. जो जिंकून येऊ शकतो आणि जनतेच्या पसंतीचा असलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, चेतन खडसे, हरीश कंगाली, ब्रम्हा काळे, राजेश रंगारी इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सुनिल केदारांवर हल्लाबोल

यावेळी बावनकुळे यांनी कॉंग्रेस नेते सुनिल केदार यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेस मत चोरीचा आरोप करीत आहे. परंतु ज्यांनी शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये खाल्ले व जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी केला. कॉंग्रेसने कामठीमध्ये मोर्चा काढला. मात्र त्या ठिकाणी मी ९५ पैकी ७५ बुथवर मागे होतो. मग मतचोरी कोणी केली, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस पक्ष खोटा अजेंडा राबवित आहे. ते खोडून काढा, त्यांना उत्तर द्या असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा