शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 10:32 IST

उद्धव ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण

नागपूर : राज्य शासनाच्या विकासकामांमुळे महाविकास आघाडीचे लोक बावचळले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत आक्रोश नव्हता तर ढोंगीपणा होता व ती बोंबाबोंब सभा होती. सत्ता वापस मिळविण्यासाठी उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीतील इतर नेते खोटारडेपणा करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सोमवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजेशाही थाट व राजेशाही खुर्ची होती. मात्र, काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे बोलायला लागले तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. मोठी खुर्ची भेटणार नाही, असे नाना पटोलेंच्या लक्षात आले होते, त्यामुळेच तेदेखील गायब झाले होते, असे बावनकुळे म्हणाले.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविला. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही काम केले नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे काय भाजपला संपविणार ?

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आवेशपूर्ण भाषण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला व हे लोकदेखील जाणतात. बाळासाहेब ठाकरे यांची जागा घेण्यासाठी उद्धव यांना १०० जन्म घ्यावे लागतील, उद्धव ठाकरे भाजपला संपविण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांना स्वत:चा पक्ष व आमदार सांभाळता आले नाहीत ते भाजपला काय संपविणार, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे