शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 10:32 IST

उद्धव ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण

नागपूर : राज्य शासनाच्या विकासकामांमुळे महाविकास आघाडीचे लोक बावचळले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत आक्रोश नव्हता तर ढोंगीपणा होता व ती बोंबाबोंब सभा होती. सत्ता वापस मिळविण्यासाठी उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीतील इतर नेते खोटारडेपणा करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सोमवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजेशाही थाट व राजेशाही खुर्ची होती. मात्र, काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे बोलायला लागले तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. मोठी खुर्ची भेटणार नाही, असे नाना पटोलेंच्या लक्षात आले होते, त्यामुळेच तेदेखील गायब झाले होते, असे बावनकुळे म्हणाले.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविला. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही काम केले नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे काय भाजपला संपविणार ?

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आवेशपूर्ण भाषण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला व हे लोकदेखील जाणतात. बाळासाहेब ठाकरे यांची जागा घेण्यासाठी उद्धव यांना १०० जन्म घ्यावे लागतील, उद्धव ठाकरे भाजपला संपविण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांना स्वत:चा पक्ष व आमदार सांभाळता आले नाहीत ते भाजपला काय संपविणार, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे