शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: September 19, 2024 23:19 IST

लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही दौरा निष्फळ ठरेल, अशीही काँग्रेसची टीका

कमलेश वानखेडे, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वर्धा येथे कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनासाठी येत आहेत. एकीकडे भाजपाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असताना दुसरीकडे काँग्रेसनेविदर्भाशी संबंधित १० प्रश्न उपस्थित करून या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी विदर्भात आले. पण त्याचा फायदा झाला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्व आले त्याचाही फायदा होणार नाही, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत १० प्रश्न उपस्थित केले. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सोलार पॅनेल प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला. यामुळे तीन हजार युवक रोजारांपासून वंचित झाले आहेत, नागपूरमध्ये वर्षभरात महिलांवरील अत्याचाराची २४७ प्रकरण समोर आली, असे असताना भाजपची लाडकी बहीण योजना महिलांचे संरक्षण कसे करणार, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी ४५ अपूर्ण सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, अमरावतीत एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेची वाट पहाताना मृत्यू झाला, अकोल्यातील खारट पाण्याची समस्या केव्हा दूर करणार, ५५ हजार कोटींच्या समृद्धी मार्गाला वर्षभरातच तडे गेले, दशकभरापासून अपूर्ण असलेला नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, या प्रकल्पातील कॅगने उघड केलेला भ्रष्टाचारवार आपण काय करणार, असे प्रश्न उपस्थित करीत याची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा