शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिंकूनही भाजप संतुष्ट नाही : सर्व बूथ नव्याने बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:23 IST

लोकसभा निवडणुकीत नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार ९ मतांच्या अंतराने जिंकले. तसेच भाजपचे मतदान वाढल्यानंतरही २०१४ च्या तुलनेत विजयाची लीड कमी झाल्याने पक्ष चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविस्तारक, शक्तिप्रमुख, बूथप्रमुखही बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार ९ मतांच्या अंतराने जिंकले. तसेच भाजपचे मतदान वाढल्यानंतरही २०१४ च्या तुलनेत विजयाची लीड कमी झाल्याने पक्ष चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपुरातून भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. नितीन गडकरी यांना एकूण ६,६०,२२१ मते मिळाली, तर काँग्रेसचे नाना पटोले हे केवळ ४,४४,२१२ मतांपर्यंत मजल मारू शकले. लोकसभेच्या सहापैकी पाच विधानसभा मतदार संघात गडकरी आघाडीवर राहिले. उत्तर नागपुरात पटोले आघाडी घेण्यात यशस्वी राहिले. भाजपने या निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सोमवारी धंतोली येथील विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत विचारमंथन केले. संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेते व शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटन मंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. आ. कोहळे यांनी बैठकीनंतर सांगितले की, लोकसभा निवडणुकीत संघटन संरचनेंतर्गत विस्तारक, शक्तिप्रमुख, बूथप्रमुख आदींना जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी लोकसभा निवडणुकीपर्यंत मर्यादित होती. पक्षाने निवडणुकीनंतर शहरातील प्रत्येक बूथवर चिंतन-मनन केले. यानंतर बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बूथचे नव्याने गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारक, शक्तिप्रमुखांनाही बदलविण्यात येईल.भाजप सूत्रानुसार ज्या बूथवर गडकरी यांना अपेक्षेनुसार मते मिळाली नाहीत तेथील पदाधिकाऱ्यांना हटविण्यात येईल. यात त्या बूथचाही समावेश आहे, जिथे गडकरी समोर आहेत, परंतु त्यांना तिथे अपेक्षित मते मिळालेली नाही. सूत्राचा दावा आहे की, पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागाचाही आढावा घेतला जात आहे. अपेक्षित यश न मिळविणाºयांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण