शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सीएएविरोधातील आंदोलनात भाजपाकडून निर्दयपणे दडपशाही : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 8:53 PM

: ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.चव्हाण म्हणाले, सीएएला असलेला विरोध शांततामय मार्गाने प्रदर्शित करावा, असे आपले जनतेला आवाहन आहे. महाराष्ट्रात शांतपणे विरोध दर्शविला जात आहे. पोलीसही ही परिस्थिती येथे उत्तमपणे हाताळत आहेत. हा कायदा घटनाविरोधी असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र सरकार हा लागू करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे राज्य सरकारची या संदर्भात भूमिका स्पष्ट आहे.ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे, तिथेच ही आंदोलने अधिक तीव्रपणे पेटली आहेत. हे वातावरण योग्य परिस्थिती हाताळून शांत करण्याची गरज असताना केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन हाताळत आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हट्टाने हा कायदा देशात लागू करू पहात आहे. यामुळे धर्मनिरपेक्षता बाजूला पडून एका धर्माचे प्राबल्य वाढविण्याचा आणि अल्पसंख्यकांना डावलण्याचा त्यांचा डाव यामागे दिसत आहे. धर्म हा कोणत्याही देशाचा आधार होऊ शकत नाही. असे असतानाही राष्ट्रीया स्वयंसेवक संघाचा अजेंडा धर्माचे प्राबल्य वाढविणे हाच आहे. तोच अजेंडा भाजपा सरकार चालवित आहे. यामुळेच देशात संघर्षाची परिस्थिती उद्भवली आहे.भारतामध्ये सुरू असलेल्या या घडामोडीकडे युरोपियन देशांचे लक्ष असून तेथील राजदूतांनी त्या संदर्भातील अहवालही संबंधित राष्ट्रांना पाठविला आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या भारताची प्रतिमा आंतराष्ट्रीय पातळीवर मलिन होत असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा