शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2023 20:26 IST

Nagpur News एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात.

 

नागपूरः एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात. अनेक मुलांना नख कुरतडण्याची सवय असते. परीक्षा काळात हे प्रमाण जास्त असते. मात्र, असे केल्याने पोटाचे, त्वचेचे जबड्याचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पालकांनी मुलांना जडलेली ही सवय बंद करण्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.

नखं का कुरतडली जातात ?

- अनेकजण विचारात मग्न असतात. एखाद्या गोष्टीचा ताण आला किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास नखं कुरतडली जातात. विचारमग्न व्यक्तीला दुसरी कुठली वस्तू उपलब्ध नसते. त्यामुळे तो सहज हाताची बोटे तोंडात टाकून नखं कुरतडतो. शिवाय नखं कुरतडल्याने इजा होत नाही, त्यामुळे ही सवय जडते.

 

सवय सोडण्यासाठी हे करा...

- ही सवय मोडायची असेल तर जेव्हा केव्हा तुम्हाला नखं कुरतडण्याची इच्छा होईल तेव्हा लगेच दुसरीकडे लक्ष केंद्रित करा.

- वाटलं तर लगेच एखादं फळ खाण्यासाठी घ्या.

- तोंडात सतत च्युईंगम, दाणेफुटाणे, लॉलीपॉप तसेच गाजरसारखे पदार्थ तोंडात ठेवा.

- जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपसूकच कुरतडण्याची सवय पुन्हा सुरू होते. त्यामुळे नखे वाढूच देऊ नका.

असे आहेत दुष्परिणाम

- पोटविकार तज्ज्ञ डॉ. अभिजित देशमुख यांच्यानुसार नखं स्वच्छ न ठेवल्यास त्यात साल्मोनेला आणि ई कोलाईसारखे विषाणू जमा होतात. सतत नखं चावण्याच्या सवयीमुळे तोंडावाटे हे विषाणू शरीरात जाऊन बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो.

- वारंवार नखं चावल्याने पेरोनिशिया नावाचं स्कीन इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. यामध्ये नखाच्या आजूबाजूच्या त्वचेत विषाणू प्रवेश करतात त्यामुळे बोटांवर लालसरपणा आणि सूज निर्माण होते.

- नखे चावल्याने त्यातील घाण दातांवर जमा होते आणि दात कमजोर होतात.

नखं कुरतडणे ही एक वाईट सवय आहे. कारण, नखं चावता चावताना त्यातील बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जातात आणि यामुळे कॅन्सरसारखा रोगही होऊ शकतो. नखं खाण्याने शरीरात ह्युमन पेपिलोमा नामक व्हायरस पसरतो. ज्यामुळे हात, ओठ आणि तोंडात मस होऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही सवय वेळेतच मोडलेली बरी.

- डॉ. अभिजित देशमुख, पोटविकार तज्ज्ञ

काही लोक खूप संवेदनशील असतात. चिंता वाढली की प्रत्येकाच्या बॉडीची एक वेगवेगळी रिॲक्शन असते. काही लोक फेरी मारतात. काही लोक टेबल वाजवतात. काही डोक्याला पेन घासतात, केस ओढतात. पाय हलवितात. तसेच काही लोक नखं कुरतडतात. नखं कुरतडताना जेव्हा मांस कापलं जातं तेव्हा त्यांना ‘रिलिज सेन्सेशन’ येते. सुखावल्यासारखे वाटते. नंतर ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावीशी वाटते व शरीराला त्याची सवय होते.

मेंदू एका इंजिनसारखा आहे. तो एका मर्यादेत विचार करतो. अतिशय जास्त विचार करायला लागले की असे होते.

- डॉ. सुशील गावंडे, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य