शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2023 20:26 IST

Nagpur News एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात.

 

नागपूरः एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात. अनेक मुलांना नख कुरतडण्याची सवय असते. परीक्षा काळात हे प्रमाण जास्त असते. मात्र, असे केल्याने पोटाचे, त्वचेचे जबड्याचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पालकांनी मुलांना जडलेली ही सवय बंद करण्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.

नखं का कुरतडली जातात ?

- अनेकजण विचारात मग्न असतात. एखाद्या गोष्टीचा ताण आला किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास नखं कुरतडली जातात. विचारमग्न व्यक्तीला दुसरी कुठली वस्तू उपलब्ध नसते. त्यामुळे तो सहज हाताची बोटे तोंडात टाकून नखं कुरतडतो. शिवाय नखं कुरतडल्याने इजा होत नाही, त्यामुळे ही सवय जडते.

 

सवय सोडण्यासाठी हे करा...

- ही सवय मोडायची असेल तर जेव्हा केव्हा तुम्हाला नखं कुरतडण्याची इच्छा होईल तेव्हा लगेच दुसरीकडे लक्ष केंद्रित करा.

- वाटलं तर लगेच एखादं फळ खाण्यासाठी घ्या.

- तोंडात सतत च्युईंगम, दाणेफुटाणे, लॉलीपॉप तसेच गाजरसारखे पदार्थ तोंडात ठेवा.

- जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपसूकच कुरतडण्याची सवय पुन्हा सुरू होते. त्यामुळे नखे वाढूच देऊ नका.

असे आहेत दुष्परिणाम

- पोटविकार तज्ज्ञ डॉ. अभिजित देशमुख यांच्यानुसार नखं स्वच्छ न ठेवल्यास त्यात साल्मोनेला आणि ई कोलाईसारखे विषाणू जमा होतात. सतत नखं चावण्याच्या सवयीमुळे तोंडावाटे हे विषाणू शरीरात जाऊन बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो.

- वारंवार नखं चावल्याने पेरोनिशिया नावाचं स्कीन इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. यामध्ये नखाच्या आजूबाजूच्या त्वचेत विषाणू प्रवेश करतात त्यामुळे बोटांवर लालसरपणा आणि सूज निर्माण होते.

- नखे चावल्याने त्यातील घाण दातांवर जमा होते आणि दात कमजोर होतात.

नखं कुरतडणे ही एक वाईट सवय आहे. कारण, नखं चावता चावताना त्यातील बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जातात आणि यामुळे कॅन्सरसारखा रोगही होऊ शकतो. नखं खाण्याने शरीरात ह्युमन पेपिलोमा नामक व्हायरस पसरतो. ज्यामुळे हात, ओठ आणि तोंडात मस होऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही सवय वेळेतच मोडलेली बरी.

- डॉ. अभिजित देशमुख, पोटविकार तज्ज्ञ

काही लोक खूप संवेदनशील असतात. चिंता वाढली की प्रत्येकाच्या बॉडीची एक वेगवेगळी रिॲक्शन असते. काही लोक फेरी मारतात. काही लोक टेबल वाजवतात. काही डोक्याला पेन घासतात, केस ओढतात. पाय हलवितात. तसेच काही लोक नखं कुरतडतात. नखं कुरतडताना जेव्हा मांस कापलं जातं तेव्हा त्यांना ‘रिलिज सेन्सेशन’ येते. सुखावल्यासारखे वाटते. नंतर ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावीशी वाटते व शरीराला त्याची सवय होते.

मेंदू एका इंजिनसारखा आहे. तो एका मर्यादेत विचार करतो. अतिशय जास्त विचार करायला लागले की असे होते.

- डॉ. सुशील गावंडे, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य