शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा मोठा निर्णय : मतांच्या गणिताकरिता मतदारसंघ रचनेला आव्हान देता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय : रिट याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदेशीर प्रक्रियेचे व्यापक स्वरुपात उल्लंघन झाले असेल आणि त्यावर आक्षेप घेणाऱ्यांना सुनावणीची योग्य संधी दिली गेली नसेल तरच, मतदारसंघ रचनेची वैधता तपासली जाऊ शकते. परंतु, केवळ मतांचे गणित बिघडल्यामुळे कोणालाही मतदारसंघ रचनेस आव्हान देता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीशी संबंधित प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांनी हा निर्णय दिला. वाशिम जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांचे गण निर्धारित करणाऱ्या आदेशाविरुद्ध दिलीप जाधव व इतरांनी रिट याचिका दाखल केली होती.

अमरावती विभागीय आयुक्तांनी हा आदेश जारी करताना निकषांचे काटेकोर पालन केले नाही, लोकसंख्या कायम असल्यामुळे गट/गण बदलण्याची गरज नव्हती इत्यादी मुद्दे याचिकाकर्त्यांनी उपस्थित केले होते. न्यायालयाने संबंधित सर्व मुद्दे मोघम व निराधार स्वरूपाचे आहेत, असे नमूद करून याचिका फेटाळून लावली.

समान विभागणी अशक्यसरकारी वकील वरिष्ठ अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी मतदारसंघातील लोकसंख्येमध्ये दहा टक्क्यांपर्यंत फरक राहू शकतो, याकडे लक्ष वेधले. त्यावर न्यायालयानेही लोकसंख्येची समान विभागणी करणे अशक्य असल्याचे आणि किरकोळ फरकामुळे मतदारसंघाची रचना अवैध ठरवली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

याचिकेचा पर्याय उपलब्धमतदारसंघ रचनेसंदर्भातील वादग्रस्त मुद्द्यांवर उच्च न्यायालयामध्ये रिट याचिकेद्वारे विचार केला जाऊ शकत नाही. याकरिता, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्याने निवडणूक याचिकेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या कायद्यातील कलम २७ अंतर्गत निवडणूक याचिका दाखल करून निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :nagpurनागपूर