शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

राज्यात १० पक्षांची महाआघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 23:31 IST

राज्यात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, सपा, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षासह ९ ते १० पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे. राष्ट्रवादीसोबतची चर्चा एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवार यांच्या बैठका झाल्या आहेत. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच यासंबंधात निर्णय होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : राष्ट्रवादीशी चर्चा निर्णायक टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, सपा, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षासह ९ ते १० पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे. राष्ट्रवादीसोबतची चर्चा एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवार यांच्या बैठका झाल्या आहेत. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच यासंबंधात निर्णय होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचा दावा केला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. त्यासाठी महाआघाडी हा एक उत्तम पर्याय आहे. कुणाचे प्राबल्य कुठे आहे, हे पाहून जागा वाटप होईल. यातही काही अचडण जाणार नाही, असे सांगत या महाआघाडीत शिवसेना व मनसेला स्थान नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, पुण्यात आमच्याकडेही सक्षम उमेदवार आहेत. अद्याप जागांची चर्चा व्हायची आहे. कोणत्या जागा कुणाला द्यायच्या, हे ठरायचे आहे. जिंकण्याची क्षमता पाहून निर्णय घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे, अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, उमाकांत अग्निहोत्री, रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.आम्हाला आपसात भिडवू नका आपले प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याची चर्चा असल्याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, पक्षात कुणीही कायमस्वरूपी पदावर नसतो. माझे मोहन प्रकाश यांच्याशीही चांगले संबंध होते व मल्लिकार्जुन खारगे यांच्याशीदेखील आहेत. त्यामुळे आम्हाला आपसात भिडविण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणार नाही. लवकरच नागपूरसह राज्याच्या सर्व विभागात खारगे यांचे दौरे आयोजित केले जाणार आहेत. ८ व ९ जुलै रोजी मुंबईत आयोजित बैठकीतही ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांचे काम ‘बिलो अ‍ॅव्हरेज’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकूणच काम ‘बिलो अ‍ॅव्हरेज’ राहिले आहे. घोषणा खूप केल्या, पण तशी कृती केली नाही. त्यांच्या कार्यकाळाचा उल्लेख ‘विश्वासघात के चार साल’ असेच करावे लागेल. फडणवीस हे विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करायचे, असा चिमटाही त्यांनी काढला. नागपुरात १०० दिवसात ६३ खून झाले. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असताना ही बाब गंभीरपणे घ्यायची नाही का, असा सवालही त्यांनी केला.माणिकरावांनी निवडणूक लढवावी विधान परिषदेवर काही सहकाऱ्यांना संधी मिळू शकली नाही. पण ते आगामी निवडणुका लढवू शकतात. माणिकराव ठाकरे यांनीही निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. कुठली लढवावी हे त्यांनी ठरवावे. वझाहत मिर्झा हे काँग्रेसचे यवतमाळचे जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसने दलित व मुस्लीम नेत्यांना संधी देऊन सोशल इंजिनिअरिंग साधले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नागपुरात बरेच इच्छुक नागपुरातून लोकसभेसाठी विलास मुत्तेमवार यांच्यासह नाना पटोले, नितीन राऊत, भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांची संख्या पाहून नागपुरात अवघड आहे, असे वाटत नाही. राजकारणात अनेक चमत्कार पाहिले आहेत, असेही ते म्हणाले. गटबाजीवर लक्ष वेधले असता वैयक्तिक मतभेद सर्वच पक्षात असतात, पक्ष जिवंत असल्याचे ते लक्षण आहे. नागपूर शहराची कार्यकारिणी तयार करण्याचे अधिकार शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणnagpurनागपूर