शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

परिवर्तनासाठी शरद पवार यांना भारत मुक्ती मोर्चाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 21:29 IST

Nagpur News संविधानाला तडा देणाऱ्यांविरोधात लढा देण्यासाठी संघटित शक्तीचे बळ पवारांच्या पाठीशी उभे करू, अशी जाहीर घोषणा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.

ठळक मुद्दे भटक्या- विमुक्त जमाती संघटनेचे अधिवेशन

नागपूर : देशात परिवर्तन घडविण्यासाठी शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांना राजकीय व प्रशासकीय दीर्घ अनुभव आहे. या परिवर्तनासाठी पवार जे काही प्रयत्न करतील त्यासाठी देशभरात व्याप्ती असलेली आमची संघटना व आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत. संविधानाला तडा देणाऱ्यांविरोधात लढा देण्यासाठी संघटित शक्तीचे बळ पवारांच्या पाठीशी उभे करू, अशी जाहीर घोषणा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.

भटक्या- विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्रचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन शनिवारी सुरेश भट सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. शरद पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर होते. मंचावर कोल्हापूरचे श्री शाहू शहाजी छत्रपती महाराज, राजे संग्रामसिंह भोसले, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, लक्ष्मण माने, हिरालाल राठोड, डॉ. कल्पना नलावडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार यांना फुले पगडी, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ हा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री शाहू शहाजी छत्रपती महाराज यांनी भटक्या- विमुक्तांना अजूनही जातीचे व जमिनीचे दाखले मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली. सर्व जमातींनी एकत्र येत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अन्याय करणाऱ्या शक्तींविरोधात मशाली पेटवा : शरद पवार

भटके- विमुक्तांना अजूनही सामाजिक शोषणातून पाहिजे तशी मुक्ती मिळालेली नाही. संघटित शक्ती हीच तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देऊ शकते. त्यामुळे आपल्यावर अन्याय करणाऱ्या शक्तींविरोधात एकसंध होऊन मशाली पेटवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

धर्मसत्ता उलथून लावा : यशवंत मनोहर

-या देशात धर्मकारण व भ्रष्टाचारकारण सुरू आहे. हे संविधानविरोधी सुरू आहे. त्यामुळे देशातील संविधानविचारी व लोकशाहीनिष्ठ लोकांनी एकत्र यावे. या परिस्थितीविरोधात आंदोलन व्हावे व ही धर्मसत्ता उलथून लावावी, असे आवाहन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. या देशात बाहेरून आलेल्या उपऱ्यांनी भटक्या-विमुक्तांना उपरे ठरवले. सत्तापिपासूंनी आपल्याला भटके ठेवले. आपण या देशाचे खरे मालक आहोत. त्यामुळे जमेल तेवढे शिक्षण घ्या, एकत्र या व सत्ता काबीज करा, असे आवाहनही त्यांनी केेले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार