शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नागपूरच्या बेझनबाग सोसायटीमधील अवैध भूखंडधारकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 22:36 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरच्या २२ अवैध भूखंडधारकांचे प्रशासनाच्या कारवाईपासून संरक्षण करण्यास नकार दिला. तसेच, अवैध भूखंडधारकांची यासंदर्भातील याचिका खारीज केली. त्यामुळे त्यांना जोरदार दणका बसला. परंतु, सर्व याचिकाकर्ते गरजू असल्याने व सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सप्टेंबरनंतरच करण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

ठळक मुद्देहायकोर्टाने दिलासा नाकारला : सप्टेंबरनंतर कारवाई करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरच्या २२ अवैध भूखंडधारकांचे प्रशासनाच्या कारवाईपासून संरक्षण करण्यास नकार दिला. तसेच, अवैध भूखंडधारकांची यासंदर्भातील याचिका खारीज केली. त्यामुळे त्यांना जोरदार दणका बसला. परंतु, सर्व याचिकाकर्ते गरजू असल्याने व सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सप्टेंबरनंतरच करण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. ६ मे २०१४ रोजी उच्च न्यायालयाने बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरचे सर्व भूखंड सहा महिन्यांत महापालिकेला हस्तांतरित करण्याचा आदेश सरकारला दिला होता. त्यानंतर आतापर्यंत केवळ ५४ भूखंडांचा ताबा मनपाला देण्यात आला. उर्वरित २२ भूखंडांवर पक्के बांधकाम असून प्रशासनाने त्या भूखंडधारकांना नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या २२ भूखंडधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरकार बेझनबाग सोसायटीला पर्यायी जमीन देणार आहे. तसेच, मूळ सार्वजनिक जमिनीवरचे अवैध भूखंड नियमित केले जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाची कारवाई थांबविली जावी असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, सरकार बेझनबाग सोसायटीला पर्यायी जमीन देणार नसल्याचे व मूळ सार्वजनिक जमिनीवरील अवैध भूखंडही नियमित करणार नसल्याचे रेकॉर्डवर उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने अवैध भूखंडधारकांची संरक्षणाची विनंती अमान्य केली. अवैध भूखंडधारकांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी तर, सार्वजनिक जमीन मोकळी करण्याची मागणी असणाऱ्या मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.विभागीय आयुक्तांना माफी नाहीउच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात अपयश आल्यामुळे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बिनशर्त माफी मागितली होती. परंतु, उच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना माफ करण्यास नकार दिला. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी प्रामाणिकपणे सहकार्य केले नाही असे परखड निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालय अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली व यावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी २६ जुलै रोजी व्यक्तीश: हजर होण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर