शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

सावधान, नागपूरचीही हवा हाेतेय वाईट; चारही स्टेशनवर निर्देशांक २२० च्यावर

By निशांत वानखेडे | Updated: November 21, 2024 18:55 IST

Nagpur : थंडी वाढताच वाढले प्रदूषण

निशांत वानखेडे

नागपूर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड वाढलेल्या प्रदूषणामुळे तेथील जनजीवन विस्कटले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास समस्या हाेत असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये प्रदूषण दिल्लीएवढे नसले तरी थंडी वाढताच हवा खराब हाेत चालली आहे. शहरातील चारही स्टेशनवर वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) २२० च्यावर पाेहचला आहे, जाे वाईट हवेचा मानक आहे.

तज्ज्ञांच्या मते दरवर्षी थंडी वाढली की प्रदूषणातही वाढ हाेते. हिवाळ्याच्या बहुतेक महिन्यात हवेची गुणवत्ता खराब असते. तीच स्थिती यावर्षीही दिसून येत आहे. साधारणत: १५ नाेव्हेंबरपासून पारा घसरून थंडीत वाढ हाेत आहे, तसे प्रदूषणही वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) च्या वेबसाईटवरील चालू आकडेवारीनुसार नागपूरच्या चारही स्टेशनवर एक्युआय २०० च्यावर गेला आहे.

भारतीय मानकानुसार वायू निर्देशांक ० ते ५० पर्यंत चांगला, ५१ ते १०० पर्यंत समाधानकारक व १०१ ते २०० पर्यंत मध्यम गुणवत्तेचा असताे. २०१ ते ३०० पर्यंत वाईट, ३०१ ते ४०० खुप खराब व ४०० च्यावर अतिशय धाेकादायक असताे. सीपीसीबीच्या १६ ते २१ नाेव्हेंबरच्या नाेंदीनुसार केवळ १९ नाेव्हेंबर राेजी एक्युआय २०० च्या आतमध्ये हाेता. इतर दिवशी ताे २१० ते २५५ पर्यंत म्हणजे वाईट स्थितीत गेल्याची नाेंद आहे.

कशी हाेती स्थिती?

  • सीपीसीबीच्या अंबाझरी, जीपीओ, रामनगर व महाल या चार स्टेशनवर दर तासाला नाेंदी घेतल्या जातात.
  • या नाेंदीनुसार २० व २१ नाेव्हेंबरला हवेची गुणवत्ता सातत्याने २२० च्यावर नाेंदविण्यात आली आहे.
  • महाल आणि रामनगर येथे २० नाेव्हेंबरला एक्युआय ३५५ पर्यंत म्हणजे अतिशय वाईट अवस्थेत गेल्याचीही नाेंद आहे.
  • दाेन्ही स्टेशनवर पहाटेचा वेळ साेडला तर प्रत्येक तासाला एक्युआय २१० ते २५५ च्यादरम्यान राहिला आहे.
  • सिव्हील लाईन्ससारख्या भागातील जीपीओ स्टेशनवर २१ राेजी दुपारी १२ वाजतापासून २२४ वर गेलेले एक्युआय सायंकाळी ६ वाजतापर्यंत २४० वर गेल्याची नाेंद आहे.

 

धुलीकण प्रदूषणास कारणीभूत

नागपूरच्या प्रदूषणात पार्टीकुलेट मॅटर (धुलीकण) हाच सर्वात माेठा घटक आहे. पीएम-२.५ व पीएम-१० या प्रदूषकाच्या वाढीमुळे संत्रानगरीत प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरात सध्या माेठ्या प्रमाणात बांधकाम हाेत आहे. त्यामुळे धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

थंडीतच का वाढते प्रदूषण?उन्हाळ्यात सर्वाधिक प्रदूषण हाेत असले तरी हे घटक वातावरणात उडून जातात. हिवाळ्यात त्याच्या विपरित असते. वातावरणात असलेल्या दवबिंदूला चिकटून प्रदूषित धुलीकण जमिनीच्या आसपासच पसरलेले असतात. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर वाढलेला असताे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर