शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

खबरदार, यापुढे वंदे भारत ट्रेनवर दगडफेक कराल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 20:47 IST

Nagpur News आता वंदे भारतच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. यानंतर दगडफेक झाली तर त्या समाजकंटकावर रेल्वेच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने समाजकंटकांना दिला आहे.

ठळक मुद्देविशेष सुरक्षा पथकांची निर्मिती

नागपूर : दगडफेक करणाऱ्या १८ समाजकंटकांवर कारवाई करूनही वंदे भारत ट्रेनवर अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन चिंतित झाले आहे. परिणामी, आता वंदे भारतच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. यानंतर दगडफेक झाली तर त्या समाजकंटकावर रेल्वेच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने समाजकंटकांना दिला आहे.

दिल्ली-वाराणसी, दिल्ली-कटरा, मुंबई-गांधीनगर कॅपिटल, दिल्ली-अम्ब अंदोरा, चेन्नई-म्हैसूर आणि नागपूर-बिलासपूर अशा सहा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. पूर्णत: स्वदेशी बनावटीच्या वंदे भारतमध्ये प्रवाशांसाठी अनेक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सहाही रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

परंतु काही समाजकंटक वेगवेगळ्या मार्गावर अधूनमधून या गाडीवर दगडफेक करून नुकसान करीत आहेत. काही ठिकाणी दगडफेकीमुळे प्रवासी जखमी झाल्याचीही माहिती आहे. गेल्या महिन्यात नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतवर छत्तीसगडमधील भिलाई दुर्गजवळ दगडफेकीची घटना घडली होती. रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असतानाच पुन्हा काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका ठिकाणी अशीच घटना घडली. या दगडफेकीत एक मुलगी जखमी झाल्याचे छायाचित्रही सर्वत्र व्हायरल झाले. रेल्वे सुरक्षा दलाने आतापर्यंत १८ जणांवर कारवाई केलेली आहे. यापुढे आणखी कडक कारवाईचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला असून नागपूर बिलासपूर मार्गावर रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या देखरेखीत विशेष सुरक्षा पथके निर्माण करण्यात आली आहेत.

रेल्वे पेरत आहे खबरे

हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांचे समुपदेशन व जनजागरण केले जात आहे. दगडफेक करणाऱ्या समाजकंटक कोण आहे हे माहीत होण्यासाठी रेल्वेने खबरे पेरणे सुरू केले आहे. यासाठी रेल्वेलाइन शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे.

...

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस