शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

३ लाख ७७ हजार कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 8:53 PM

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

ठळक मुद्देयोजनेच्या लाभासाठी ई-कार्ड तयार करणे आवश्यकसर्व कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ई-कार्ड तयार करण्याची सुविधापाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारजिल्ह्यातील २६ रुग्णालयात मिळणार उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख पात्र लाभार्थ्यांना ९७१ आजारावर पूर्णपणे नि:शुल्क उपचार उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेतील कुटुंबांच्या सदस्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठविले असून, या पत्रासह रेशनकार्ड आदी कागदपत्र, दोन पासपोर्ट साईजचे फोटो गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जमा करून लाभार्थ्यांनी आपले ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ई-कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्यांना ३० रुपये भरणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अंगिकृत शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा नि:शुल्क राहणार आहे. यामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचार, मानसिक आजारावरील उपचाराचासुद्धा समावेश आहे. कुटुंबाचा समावेश असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर येथे संगणक प्रणालीद्वारे कुटुंब ई-कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंब ई-कार्ड तयार करण्यासाठी तालुक्याचे आरोग्य सेवक, सेविका, आशा यांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांचे पत्र वाटप करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांची यादी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना शहर व ग्रामीण या दोन्ही भागांसाठी लागू असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शहरातील आपले सरकार सेवा पोर्टल व ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन ई-कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरprime ministerपंतप्रधानHealthआरोग्य