शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:05 IST

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.

ठळक मुद्देभाजपा प्रभाग ३२ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.भाजपच्या प्रभाग ३२ तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी स्मृती भवन, शारदा चौक येथे करण्यात आला. यावेळी शेलार बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मोहन मते, नगरसेविका रूपाली ठाकूर, पुष्पा राऊत, दीपक चौधरी, अभय गोटेकर, संजू ठाकूर, परशु ठाकूर, बबनराव भुयारकर आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाची गती हजार पटीने वाढविली आहे. त्यांनी आता जलसिंचनाच्या कामातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा पण घेतला असून ते यात निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सत्कार हा आईवडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे ऋण व्यक्त करणारा असतो. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबत संस्कृतीचे व संस्काराचे जतन केल्यास जगाच्या स्पर्धेत आपला देश पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणीचा क्रमांक जाहीर करीत सदस्यता घेणाऱ्या दोन सदस्यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी वस्त्या, गल्ली व चाळीत जाऊन अधिकाधिक सदस्य बनवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात दहावी, बारावीच्या २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाStudentविद्यार्थी