शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बाळासाहेब ठाकरेंसह चौघांना भारतरत्न द्या : प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:40 PM

रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.

ठळक मुद्देदेशाची अर्थव्यवस्था ‘ऑक्सिजन’वर

नागपूर : रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. या चौघांनीही या आंदोलनाला नेतृत्व दिले व त्यांच्या कार्यासाठी केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. नागपुरात पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बुधवारी बोलत होते.यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला जावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (एएचपी) अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. ते बुधवारी नागपुरातील प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत अयोध्येत राममंदिराच्या निर्मिर्तीसाठी १५ सदस्यीय ट्रस्टची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी पत्रपरिषदेत भाष्य केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात हमीर सिंह गोहिल यांचे योगदान होते. सोमनाथ मंदिरात जाणारे भाविक देवदर्शनापूर्वी गोहिल यांच्या स्मारकाचे दर्शन घेतात. त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिर बनावे यासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या रामभक्तांचे अयोध्येत स्मारक बनविण्यात यावे, असे तोगडिया म्हणाले. पत्रपरिषदेला किशोर दिकोंडवार, अनुप जयस्वाल, तेजेंदरसिंह ठाकूर, हेमंत त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.केंद्र सरकारच्या अपयशामुळे महिला अत्याचार वाढलेयावेळी तोगडिया यांनी महाराष्ट्रातील हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे महिलांना जाळण्याच्या घटनांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या अपयशामुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशी प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवून १०० दिवसांत निकाल जाहीर झाला पाहिजे. शिवाय दोषसिद्धीचा दरदेखील वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. देशाची अर्थव्यवस्थादेखील ‘आॅक्सिजन’वर आहे व देशाची सूत्रे योग्य व्यक्तीच्या हाती असती तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका केली.देशातील मुस्लिम करत आहेत भाजपचे ‘मार्केटिंग’‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून शाहीनबाग येथे मुस्लिम आंदोलन करत आहेत. प्रत्यक्षात भाजपमध्ये आता हिंदूंना प्रभावित करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे या हिंदूंना जागृत करून भाजपचे ‘मार्केटिंग’ करण्याचे काम शाहीनबागसारख्या आंदोलनातून होत आहे. याबदल्यात देशात ‘एनआरसी’ लागू करण्याची केंद्राची कुठलीही योजना नाही, असे मंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या घरी यासंदर्भात सर्व रूपरेषा तयार झाली, असा दावा डॉ. तोगडिया यांनी केला.भाजपाने हिंदुत्वाचे नुकसान केलेमहाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला काहीच हरकत नव्हती. शिवसेनेने प्रत्येक वेळी भाजपला साथ दिली होती. भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत हिंदुत्वाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे संघ परिवारानेदेखील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नुकसान केले असून यामुळे हिंदू चळवळीला मोठा धक्का बसला आहे, असेदेखील डॉ. तोगडिया म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे