शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बॅग विक्रेत्याची नागपुरातील सक्करदऱ्यात हत्या : तलवारीचे घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:32 IST

दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली.

ठळक मुद्देआरोपी गुंड बापलेक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली. मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडे प्लॉट परिसरात ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंटी ऊर्फ शेरखान नूरखान शेख आणि त्याचा बाप नूरखान शेख अशी आरोपींची नावे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले.भांडे प्लॉट परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स नामक इमारत आहे. या इमारतीत व्यापाऱ्यांची वेगवेगळे दुकाने आहे आणि डॉक्टर व अन्य व्यावसायिकही तेथे ते आपली सेवा देतात. इमारतीच्या खालच्या भागात आरोपी बंटी आणि त्याचा बाप नूरखान शेख या दोघांनी प्रारंभी एचबीटी नावाने मटन चिकनचे हॉटेल सुरू केले होते. ते या भागात सर्वत्र घाण करून ठेवत असल्याने आरोपींना इमारतीतील दुकानदारासह बाजूच्या नागरिकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे आरोपींना ते दुकान बंद करावे लागले. परिणामी आरोपी कमालीचे चिडले होते. ते कुणाही सोबत वाद घालायचे आणि त्यांना मारहाण करायचे.मंगळवारी त्यांनी बॅगविक्रेता हरिभाऊ सावरकर यांच्यासोबत वाद सुरू केला. त्यांच्या घरापासून काही अंतरावर दुपारी ४.३० च्या सुमारास आरोपी बंटी आणि त्याचा बाप नूरखान शेख या दोघांनी सावरकर यांच्यावर तलवारीने हल्ला चढवून त्यांची भीषण हत्या केली. भररस्त्यावर हा थरारक प्रकार घडल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. लॉकडाऊन असूनही प्रचंड गर्दी तेथे जमली. माहिती कळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला व जमावाला शांत केले.वादाला बिल्डरही कारणीभूत ?गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या जीवघेण्या वादाला ही इमारत बांधणारा बिल्डरही कारणीभूत असल्याची जोरदार चर्चावजा आरोप संतप्त नागरिकांमध्ये होता. बिल्डरने पार्किंगची जागा गुंड बापलेकाला विकली. त्यामुळेच हा वाद सुरू झाला. तो टोकाला गेल्यानंतर बिल्डरने वाद निकाली काढण्याऐवजी आपली जबाबदारी झटकली. त्याचमुळे हे गुंड बापलेक वारंवार तेथील व्यापाऱ्यांवर हल्ला करून दहशत पसरवत होते.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर