नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना होत असलेल्या मनस्तापाची मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी गंभीर दखल घेतली. तसेच, बच्चू कडू यांनी महामार्ग व इतर सर्व रस्ते तातडीने शांततापूर्ण पद्धतीने मोकळे करावे, असा आदेश दिला.
या प्रकरणावर न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मार्ग मोकळे करताना बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला. बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्यास आणि मार्ग मोकळे न केल्यास पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व मार्ग मोकळे करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश दिले.
आदेशाचे पालन आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात यावे, असेही बजावले. याशिवाय, पोलिस आयुक्तांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल मागितला. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले यांना सन्मानपूर्वक बाहेर काढले जावे, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले. या आंदोलनाकरिता २६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे आंदोलकांवर कायद्यानुसार कारवाई करावी, असेसुद्धा न्यायालयाने सांगितले.
Web Summary : The High Court has ordered Bachchu Kadu to immediately clear the highway blocked by his protest. Failure to comply will result in police action and potential legal consequences for violating previous orders. The court demands a compliance report by tomorrow.
Web Summary : उच्च न्यायालय ने बच्चू कडू को उनके विरोध के कारण अवरुद्ध राजमार्ग को तुरंत खाली करने का आदेश दिया। अनुपालन में विफलता के परिणामस्वरूप पुलिस कार्रवाई होगी और पिछले आदेशों का उल्लंघन करने पर संभावित कानूनी परिणाम होंगे। अदालत ने कल तक अनुपालन रिपोर्ट मांगी है।