शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

आयुष्यमान भारत योजना : ‘नी’, ‘हिप रिप्लेसमेंट’ शासकीय रुग्णालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:35 IST

आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत.

ठळक मुद्दे११ महिन्यानंतरही खासगी इस्पितळांना ठेवले दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. खासगी इस्पितळांना या शस्त्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. यामागे योजनेत शस्त्रक्रियेसाठी फार कमी निधी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, मेयो व मेडिकलमध्ये या दोन्ही शस्त्रक्रियेचा भार वाढल्याने शेकडो रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१८ पासून झाली. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून ही योजना सुरू झाली, तर चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात खासगी इस्पितळांचा समावेश करण्यात आला आहे. यात आशा हॉस्पिटल, गिल्लूरकर हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, महात्मे आय हॉस्पिटल, मोगरे हॉस्पिटल, एचसीजी एनसीआयएचआरआय, सूरज आय हॉस्पिटल, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट वेस्ट हायकोर्ट रोड, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, कुणाल हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, अर्चनेगेल हॉस्पिटल, मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सारक्षी नेत्र हॉस्पिटल आदी २३ इस्पितळांचा समावेश आहे. यातील काही खासगी इस्पितळे गुडघा (नी) व ‘हिप’ प्रत्यारोपण करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे रुग्णही आहेत. परंतु आयुष्यमान भारत योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आड येत आहेत.सूत्रानुसार, खासगी इस्पितळांमध्ये या शस्त्रक्रियेला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. योजनेत शस्त्रक्रियेचा खर्च केवळ ९० हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयात लाभार्थी रुग्णांकडून वरील पैसे घेण्याची शक्यता आहे. यामुळे ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ या दोन्ही शस्त्रक्रिया मेयो व मेडिकलमध्येच करण्याच्या सूचना असल्याचे बोलले जाते. परंतु या दोन्ही रुग्णालयात अस्थिव्यंगोपचाराचे इतरही रुग्ण राहत असल्याने आठवड्यातून एक किंवा दोनच शस्त्रक्रिया होतात. विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातूनही शस्त्रक्रियेसाठी रुग्ण येत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. काहींना महिनाभरानंतर शस्त्रक्रियेसाठी बोलविले जात असल्याने खासगी इस्पितळांमध्ये याबाबत विचाराणा होत आहे, परंतु रुग्णांच्या पदरी निराशा पडत आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल