शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आयुष्यमान भारत योजना : ‘नी’, ‘हिप रिप्लेसमेंट’ शासकीय रुग्णालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:35 IST

आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत.

ठळक मुद्दे११ महिन्यानंतरही खासगी इस्पितळांना ठेवले दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. खासगी इस्पितळांना या शस्त्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. यामागे योजनेत शस्त्रक्रियेसाठी फार कमी निधी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, मेयो व मेडिकलमध्ये या दोन्ही शस्त्रक्रियेचा भार वाढल्याने शेकडो रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१८ पासून झाली. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून ही योजना सुरू झाली, तर चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात खासगी इस्पितळांचा समावेश करण्यात आला आहे. यात आशा हॉस्पिटल, गिल्लूरकर हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, महात्मे आय हॉस्पिटल, मोगरे हॉस्पिटल, एचसीजी एनसीआयएचआरआय, सूरज आय हॉस्पिटल, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट वेस्ट हायकोर्ट रोड, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, कुणाल हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, अर्चनेगेल हॉस्पिटल, मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सारक्षी नेत्र हॉस्पिटल आदी २३ इस्पितळांचा समावेश आहे. यातील काही खासगी इस्पितळे गुडघा (नी) व ‘हिप’ प्रत्यारोपण करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे रुग्णही आहेत. परंतु आयुष्यमान भारत योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आड येत आहेत.सूत्रानुसार, खासगी इस्पितळांमध्ये या शस्त्रक्रियेला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. योजनेत शस्त्रक्रियेचा खर्च केवळ ९० हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयात लाभार्थी रुग्णांकडून वरील पैसे घेण्याची शक्यता आहे. यामुळे ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ या दोन्ही शस्त्रक्रिया मेयो व मेडिकलमध्येच करण्याच्या सूचना असल्याचे बोलले जाते. परंतु या दोन्ही रुग्णालयात अस्थिव्यंगोपचाराचे इतरही रुग्ण राहत असल्याने आठवड्यातून एक किंवा दोनच शस्त्रक्रिया होतात. विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातूनही शस्त्रक्रियेसाठी रुग्ण येत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. काहींना महिनाभरानंतर शस्त्रक्रियेसाठी बोलविले जात असल्याने खासगी इस्पितळांमध्ये याबाबत विचाराणा होत आहे, परंतु रुग्णांच्या पदरी निराशा पडत आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल