शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी अ‍ॅफकॉन कंपनीच्या संपत्तीचा लिलाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:58 IST

सरकारी व खासगी जमिनीतील कोट्यवधी रुपयाच्या गौण खनिजाची चोरी करणाऱ्या अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह इतर संबंधितांच्या संपत्तीचा लिलाव करून नुकसान भरून काढण्यात यावे व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांना मागणी : सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गासाठी अनमोल पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सरकारी व खासगी जमिनीतील कोट्यवधी रुपयाच्या गौण खनिजाची चोरी करणाऱ्या अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह इतर संबंधितांच्या संपत्तीचा लिलाव करून नुकसान भरून काढण्यात यावे व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे. यासंदर्भात खेडकर गेल्या अनेक महिन्यांपासून कणखर लढा देत आहेत.अ‍ॅफकॉन कंपनीला समृद्धी महामार्ग प्रकल्पातील खडकी आमगाव ते पिंपळगाव(जि. वर्धा)पर्यंतच्या रोडचे कंत्राट मिळाले आहे. या कंपनीने मुरुम भरून जमीन समांतर करण्याकरिता एम. पी. कन्स्ट्रक्शनला उपकंत्राट दिले आहे. या कंपन्यांनी समृद्धी महामार्ग व अन्य उद्देशाकरिता मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील तलाव व झुडपी जंगलासह शेकडो एकर सरकारी, आदिवासी व खासगी जमिनीवर अवैध खोदकाम करून मुरुम, रेती व दगड बाहेर काढले. याशिवाय त्यांनी मोठ्या आकाराचे व पर्यावरणोपयोगी साग, कडुनिंब, बोर, सिरस, रामकाठी, प्रासोपिक इत्यादी प्रजातीची २५ ते ३० वर्षे जुनी ५० हजारावर जुनी झाडे तोडली. उंच टेकड्या सपाट केल्या. मौजा कोटंबा व इटाळा येथे सामाजिक वनीकरण विभागाने ३५ हजार वृक्ष लावले होते. झाडे तोडण्यात आल्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात यावा, असे खेडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.सरकार व वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे अ‍ॅफकॉन कंपनीने ही बेकायदेशीर व निर्ढावलेपणाची कृती केली. त्यासाठी अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, वन विभाग, महसूल विभाग, ग्राम पंचायत व सामाजिक वनीकरण कार्यालयाने त्याकडे कानाडोळा केला आहे. परिणामी, या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकार सामान्य नागरिकांना झाडे लावण्याचा संदेश देते. परंतु, हजारो झाडे तोडणाऱ्या बलाढ्य कंपन्यांना हात लावला जात नाही. हे चित्र बदलले पाहिजे. अन्यथा सामान्य जनतेचा व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही, असे मत खेडकर यांनी व्यक्त केले आहे.आदिवासी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळअ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर खोदकाम केले. त्यामुळे शेतात व शेताजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, आदिवासी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय अ‍ॅफकॉन कंपनीने आदिवासी जमीन अहस्तांतरण कायद्याची पायमल्ली केली आहे. असे असताना कंपनीवर कारवाई का केली जात नाही हा प्रश्न भेडसावत आहे, असे खेडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.आदिवासी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळअ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर खोदकाम केले. त्यामुळे शेतात व शेताजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, आदिवासी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय अ‍ॅफकॉन कंपनीने आदिवासी जमीन अहस्तांतरण कायद्याची पायमल्ली केली आहे. असे असताना कंपनीवर कारवाई का केली जात नाही हा प्रश्न भेडसावत आहे, असे खेडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्री