शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आशिष देशमुखांचा आता वेणुगोपाल यांच्यावरच निशाणा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 11:10 IST

देशमुख यांनी वेणुगोपाल यांच्यावर साधला निशाणा

नागपूर : अ.भा. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सातत्याने लाड होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रमेश चेन्निथाला यांच्या नेतृत्वातील एक सदस्यीय समितीचा कुठलाही फायदा होणार नाही. ही समिती एक ढोंग आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.

देशमुख यांनी यावेळी थेट वेणुगोपाल यांच्यावर निशाणा साधला आहे. पटोले हे जेव्हापासून भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हापासून त्यांना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदापासून तर प्रदेशाध्यक्षपदापर्यंत अशी विविध आठ पदे देण्यात आली आहेत. सरकार शाबूत राहिले असते तर पटोले मंत्रीही झाले असते. वेणुगोपाल यांच्यासारखे अपरिपक्व व्यक्ती संपूर्ण देशातली काँग्रेस हाताळत आहे. त्यांच्याकडून काही सकारात्मक निर्णय पुढच्या काळात येतील अशी शक्यता दिसत नाही. ज्याप्रमाणे मागच्या सात-आठ वर्षांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची पीछेहाट झाली तशीच आता होईल, असेही देशमुख म्हणाले.

वेणुगोपाल हे पटोलेंच्या खिशात आहेत. पटोलेंचे धागेदोरे हे संपूर्ण हायकमांडच्या वर्तुळात आहेत. त्यामुळे नाना पाटोलेंना नक्कीच बदलण्यात येणार नाही. त्यासाठीच या कमिटीचा फार्स नेमण्यात आला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेस