शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासाठीही निवडणूक घ्या; आशिष देशमुख यांनी पुन्हा साधला नेम

By कमलेश वानखेडे | Updated: September 16, 2022 18:27 IST

नियुक्त्यांमुळे पक्षाचे नुकसान

नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी ज्या पद्धतीने निवडणूक होणार आहे, त्याच पद्धतीने प्रदेश अध्यक्षपदासाठीही निवडणूक व्हावी. दोन्ही अध्यक्षांसाठी एकाच दिवशी मतदान व्हावे. काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी याबाबतचा निर्णय त्वरित जाहीर करावा, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी उघडपणे मांडली.

देशमुख म्हणाले, आजवर झालेल्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाची अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे आता नेमणुकीची पद्धत बंद करावी व निवडणूक घ्यावी. प्रदेश अध्यक्ष नेमण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांकडे सोपविणे हे चुकीचे आहे. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होते, तर प्रदेशाध्यक्षाची निवड करताना ती प्रक्रिया का अवलंबली जात नाही, असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले हे निवडून आलेले अध्यक्ष नाहीत. त्यांची नियुक्ती झाली होती. पण आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

निवडून आलेल्या अध्यक्षाला एक वेगळे महत्व असते. लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेस पक्ष जात असताना कुठेतरी या नियुक्त्या होत असतील तर त्याला खोडा लागल्यासारखं होईल. त्यामुळे, या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. ते होऊ नये, असे वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षही निवडून जाण्याची गरज आहे. सर्व प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीतील सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही निवडणुकीतून निवड करावी, असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshish Deshmukhआशीष देशमुख