शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासाठीही निवडणूक घ्या; आशिष देशमुख यांनी पुन्हा साधला नेम

By कमलेश वानखेडे | Updated: September 16, 2022 18:27 IST

नियुक्त्यांमुळे पक्षाचे नुकसान

नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी ज्या पद्धतीने निवडणूक होणार आहे, त्याच पद्धतीने प्रदेश अध्यक्षपदासाठीही निवडणूक व्हावी. दोन्ही अध्यक्षांसाठी एकाच दिवशी मतदान व्हावे. काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी याबाबतचा निर्णय त्वरित जाहीर करावा, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी उघडपणे मांडली.

देशमुख म्हणाले, आजवर झालेल्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाची अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे आता नेमणुकीची पद्धत बंद करावी व निवडणूक घ्यावी. प्रदेश अध्यक्ष नेमण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांकडे सोपविणे हे चुकीचे आहे. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होते, तर प्रदेशाध्यक्षाची निवड करताना ती प्रक्रिया का अवलंबली जात नाही, असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले हे निवडून आलेले अध्यक्ष नाहीत. त्यांची नियुक्ती झाली होती. पण आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

निवडून आलेल्या अध्यक्षाला एक वेगळे महत्व असते. लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेस पक्ष जात असताना कुठेतरी या नियुक्त्या होत असतील तर त्याला खोडा लागल्यासारखं होईल. त्यामुळे, या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. ते होऊ नये, असे वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षही निवडून जाण्याची गरज आहे. सर्व प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीतील सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही निवडणुकीतून निवड करावी, असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshish Deshmukhआशीष देशमुख