शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Arvind Kejriwal: महाराष्ट्रातील सरकारी शाळा, रुग्णालयांच्या दुरवस्थेवरून केजरीवालांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:39 IST

Arvind Kejriwal Criticize Maharashtra Government: अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नागपूर - पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आज नागपूरमध्ये लोकमतच्या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सध्या  राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, चोरी असं चित्र बनलं आहे. पण आम्हाला गुंडगिरी, दंगे करता येत नाही. आम्हाला शाळा, रुग्णालये बनवता येतात. मी तुम्हाला दिल्लीत आमंत्रित करतो शाळा, महाविद्यालये पाहण्यासाठी दिल्लीत या. तेथील सुविधा पाहा. महाराष्ट्रातही सरकारी शाळांची दुरवस्था झालेली आहे. झालेली आहे की नाही? दिल्लीमध्येही तशीच परिस्थिती होती. मुले शाळेत येत नव्हती. मुलं आली तरी परत जायची. शिक्षक शिकवत नव्हते. रिझल्टही वाईट यायचा. पण आज दिल्लीतील सरकारी शाळा एवढ्या सुधरल्या आहेत की, यावेळी सरकारी शाळांचे १२वीचे निकाल हे ९९.७ टक्के लागले आहेत. खासगी शाळांनाही सरकारी शाळांनी मागे टाकले आहे. यावर्षी दिल्लीत चार लाख मुलांनी खासगी शाळामधून दाखले काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतलाय. यात श्रीमंतांच्या मुलांचा समावेश आहे.

दिल्लीमध्ये आधी सरकारी रुग्णालयाची अवस्था वाईट होती. महाराष्ट्रातही सध्या तशीच परिस्थिती आहे ना. औषधे मिळत नाहीत. अनेक रुग्णालयात मशिनरी चांगली नाही. डॉक्टर बाहेर उपचार करायला सांगतात. मात्र आम्ही आता ही परिस्थिती बदलली आहे. आम्ही त्रिस्तरीय यंत्रणा सुरू केली आहे. मोहल्ला क्लिनिक सुरू केले हे. तिथे एक डॉक्टर बसवला आहे. चाचण्या, औषधे फ्री. त्यानंतर पॉलिक्लिनिक येथे आठ डॉक्टर असतात. त्यानंतर सुपरस्पेशालिटी आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिलट सुरू केली आहेत. मी रिपोर्ट देण्याचे आदेश दिले. आज दिल्लीतील लोक मोठ्या रुग्णालयात नाही तर सरकारी रुग्णालयात जातात. दिल्लीत दोन कोटी लोक राहतात. आम्ही दिल्लीतील सर्वांवर मोफत उपचारांची घोषणा केली आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे