शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Arvind Kejriwal: महाराष्ट्रातील सरकारी शाळा, रुग्णालयांच्या दुरवस्थेवरून केजरीवालांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:39 IST

Arvind Kejriwal Criticize Maharashtra Government: अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नागपूर - पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आज नागपूरमध्ये लोकमतच्या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सध्या  राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, चोरी असं चित्र बनलं आहे. पण आम्हाला गुंडगिरी, दंगे करता येत नाही. आम्हाला शाळा, रुग्णालये बनवता येतात. मी तुम्हाला दिल्लीत आमंत्रित करतो शाळा, महाविद्यालये पाहण्यासाठी दिल्लीत या. तेथील सुविधा पाहा. महाराष्ट्रातही सरकारी शाळांची दुरवस्था झालेली आहे. झालेली आहे की नाही? दिल्लीमध्येही तशीच परिस्थिती होती. मुले शाळेत येत नव्हती. मुलं आली तरी परत जायची. शिक्षक शिकवत नव्हते. रिझल्टही वाईट यायचा. पण आज दिल्लीतील सरकारी शाळा एवढ्या सुधरल्या आहेत की, यावेळी सरकारी शाळांचे १२वीचे निकाल हे ९९.७ टक्के लागले आहेत. खासगी शाळांनाही सरकारी शाळांनी मागे टाकले आहे. यावर्षी दिल्लीत चार लाख मुलांनी खासगी शाळामधून दाखले काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतलाय. यात श्रीमंतांच्या मुलांचा समावेश आहे.

दिल्लीमध्ये आधी सरकारी रुग्णालयाची अवस्था वाईट होती. महाराष्ट्रातही सध्या तशीच परिस्थिती आहे ना. औषधे मिळत नाहीत. अनेक रुग्णालयात मशिनरी चांगली नाही. डॉक्टर बाहेर उपचार करायला सांगतात. मात्र आम्ही आता ही परिस्थिती बदलली आहे. आम्ही त्रिस्तरीय यंत्रणा सुरू केली आहे. मोहल्ला क्लिनिक सुरू केले हे. तिथे एक डॉक्टर बसवला आहे. चाचण्या, औषधे फ्री. त्यानंतर पॉलिक्लिनिक येथे आठ डॉक्टर असतात. त्यानंतर सुपरस्पेशालिटी आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिलट सुरू केली आहेत. मी रिपोर्ट देण्याचे आदेश दिले. आज दिल्लीतील लोक मोठ्या रुग्णालयात नाही तर सरकारी रुग्णालयात जातात. दिल्लीत दोन कोटी लोक राहतात. आम्ही दिल्लीतील सर्वांवर मोफत उपचारांची घोषणा केली आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे