शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

तुम्ही 'कॅल्शियम कार्बाइड'ने पिकवलेले आंबे तर खात नाही ना?

By सुनील चरपे | Updated: May 5, 2025 12:04 IST

ओळखायचे कसे : खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

सुनील चरपेनागपूरआंबा दिसला की तो खाण्याची कुणालाही इच्छा होते. बहुतांश ग्राहक चमकदार व आकर्षक दिसणारे आंबे खरेदी करण्यावर अधिक भर देतात. इथेच त्यांची गफलत होते. पक्व झालेले कच्चे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेट तसेच इथिलीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या रसायनांनी पिकवलेले आंबे ओळखायचे कसे?

आंबे पिकण्यासाठी स्वतः मध्ये आइथिलीन वायू तयार करतात व वातावरणात सोडतात. हा वायू खूपच हलका असल्याने लवकर उडतो. तो उडून जाऊ नये म्हणून पूर्वी आंबे झाडांची पाने, वाळलेले गवत अथवा कपड्यांनी झाकून ठेवले जायचे. हा वायू मानवी आरोग्यास अपायकारक नसल्याने सरकारने आंबे पिकवण्यासाठी विशिष्ट प्रमाण व योग्य पद्धतीने इथ्रेल व इथेफॉन वापरण्याला परवानगी दिली आहे. याचा वापर रायपनिंग चेंबरमध्ये केला जातो. याचे द्रावण आंब्यावर फवारणे घातक असते. ते रायपनिंग चेंबरमधील हवेत फवारावे लागते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. भगवान कापसे यांनी दिली.

आंबे लवकर पिकवण्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटच्या पुड्या आंब्याच्या ढिगात ठेवतात. या दोन्ही रसायनांपासून अॅसिटिलीन वायू तयार होतो. हा वायू 'डी-ग्रीनिंग' असल्याने फळांना २४ ते ३६ तासांत पिवळा रंग प्राप्त होतो, असेही डॉ. भगवान कापसे यांनी सांगितले. हे रसायन 'चायना पुडी' नावाने बाजारात ओळखले जात असले, तरी त्याचा चीनसोबत संबंध नाही. इथ्रेल किंवा इथेफॉनच्या पुड्या आंब्यांमध्ये ठेवतात. त्या आंब्याच्या थेट संपर्कात येत असल्याने घातक ठरू शकते.

आर्सेनिकचे प्रमाण वाढण्याची शक्यताकाही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडची पावडर आंब्यावर टाकतात. कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक व फॉस्फरसचे घटक असतात. आंबे पिकवल्यावर ते फळात राहू शकतात. कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या फळांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढू शकते. आर्सेनिक विषारी असल्याने ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कॅल्शियम कार्बाइडच्या धुरामुळे माणसांची दृष्टी जाण्याची शक्यता असते.

कॅल्शियम कार्बाइड किंवा कार्बोनेटने पिकवलेले आंबेकॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटने पिकवलेल्या आंब्यांची साल वरून चमकदार असते. संपूर्ण साल एकसारखी पिवळीधम्मक दिसते. हे आंबे नरम नसतात. त्यांचा सुगंध येत नाही. वास घेतल्यास नाकाला चुरचूर होते. तीन चार दिवसांत आंब्यांवर काळे डाग पडतात.

"आंब्यांना घनता (ग्रॅव्हिटी) असते. एकपेक्षा जास्त घनता असल्यास ते पाण्यात बुडतात. एक किंवा एकपेक्षा कमी घनता असेल तर ते आंबे पाण्यावर तरंगतात. यावरून आंबे नेमके कशाने पिकवलेले आहेत, ते ओळखणे कठीण जाते."- डॉ. भगवान कापसे, कृषी शास्त्रज्ञ

"आम्ही आंबे पिकवण्यासाठी हळद व वेखंड वापरतो. एक लिटर पाण्यात प्रत्येकी पाच ग्रॅम हळद व वेखंड मिसळतो. त्या द्रावणात १० मिनिटे आंबे बुडवून बाहेर काढतो. ते न पुसता कोरडे झाल्यावर पिकायला ठेवतो. आठ ते दहा दिवसात आंबे पिकतात व चांगला गोडवा येतो."- किशोर सरोदे, आंबा उत्पादक, सिंधू फार्म, यवतमाळ

 

टॅग्स :MangoआंबाHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नnagpurनागपूर