शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही 'कॅल्शियम कार्बाइड'ने पिकवलेले आंबे तर खात नाही ना?

By सुनील चरपे | Updated: May 5, 2025 12:04 IST

ओळखायचे कसे : खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

सुनील चरपेनागपूरआंबा दिसला की तो खाण्याची कुणालाही इच्छा होते. बहुतांश ग्राहक चमकदार व आकर्षक दिसणारे आंबे खरेदी करण्यावर अधिक भर देतात. इथेच त्यांची गफलत होते. पक्व झालेले कच्चे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेट तसेच इथिलीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या रसायनांनी पिकवलेले आंबे ओळखायचे कसे?

आंबे पिकण्यासाठी स्वतः मध्ये आइथिलीन वायू तयार करतात व वातावरणात सोडतात. हा वायू खूपच हलका असल्याने लवकर उडतो. तो उडून जाऊ नये म्हणून पूर्वी आंबे झाडांची पाने, वाळलेले गवत अथवा कपड्यांनी झाकून ठेवले जायचे. हा वायू मानवी आरोग्यास अपायकारक नसल्याने सरकारने आंबे पिकवण्यासाठी विशिष्ट प्रमाण व योग्य पद्धतीने इथ्रेल व इथेफॉन वापरण्याला परवानगी दिली आहे. याचा वापर रायपनिंग चेंबरमध्ये केला जातो. याचे द्रावण आंब्यावर फवारणे घातक असते. ते रायपनिंग चेंबरमधील हवेत फवारावे लागते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. भगवान कापसे यांनी दिली.

आंबे लवकर पिकवण्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटच्या पुड्या आंब्याच्या ढिगात ठेवतात. या दोन्ही रसायनांपासून अॅसिटिलीन वायू तयार होतो. हा वायू 'डी-ग्रीनिंग' असल्याने फळांना २४ ते ३६ तासांत पिवळा रंग प्राप्त होतो, असेही डॉ. भगवान कापसे यांनी सांगितले. हे रसायन 'चायना पुडी' नावाने बाजारात ओळखले जात असले, तरी त्याचा चीनसोबत संबंध नाही. इथ्रेल किंवा इथेफॉनच्या पुड्या आंब्यांमध्ये ठेवतात. त्या आंब्याच्या थेट संपर्कात येत असल्याने घातक ठरू शकते.

आर्सेनिकचे प्रमाण वाढण्याची शक्यताकाही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडची पावडर आंब्यावर टाकतात. कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक व फॉस्फरसचे घटक असतात. आंबे पिकवल्यावर ते फळात राहू शकतात. कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या फळांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढू शकते. आर्सेनिक विषारी असल्याने ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कॅल्शियम कार्बाइडच्या धुरामुळे माणसांची दृष्टी जाण्याची शक्यता असते.

कॅल्शियम कार्बाइड किंवा कार्बोनेटने पिकवलेले आंबेकॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटने पिकवलेल्या आंब्यांची साल वरून चमकदार असते. संपूर्ण साल एकसारखी पिवळीधम्मक दिसते. हे आंबे नरम नसतात. त्यांचा सुगंध येत नाही. वास घेतल्यास नाकाला चुरचूर होते. तीन चार दिवसांत आंब्यांवर काळे डाग पडतात.

"आंब्यांना घनता (ग्रॅव्हिटी) असते. एकपेक्षा जास्त घनता असल्यास ते पाण्यात बुडतात. एक किंवा एकपेक्षा कमी घनता असेल तर ते आंबे पाण्यावर तरंगतात. यावरून आंबे नेमके कशाने पिकवलेले आहेत, ते ओळखणे कठीण जाते."- डॉ. भगवान कापसे, कृषी शास्त्रज्ञ

"आम्ही आंबे पिकवण्यासाठी हळद व वेखंड वापरतो. एक लिटर पाण्यात प्रत्येकी पाच ग्रॅम हळद व वेखंड मिसळतो. त्या द्रावणात १० मिनिटे आंबे बुडवून बाहेर काढतो. ते न पुसता कोरडे झाल्यावर पिकायला ठेवतो. आठ ते दहा दिवसात आंबे पिकतात व चांगला गोडवा येतो."- किशोर सरोदे, आंबा उत्पादक, सिंधू फार्म, यवतमाळ

 

टॅग्स :MangoआंबाHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नnagpurनागपूर