शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गाेंदियात असू शकतात युरेनियमचे साठे? परमाणू खनिज अन्वेषण विभागाचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2023 08:00 IST

Nagpur News गाेंदियाच्या आमगाव जवळ ‘युराेनियम’च्या साठ्याबाबत मिळालेल्या संकेतानुसार गेल्या काही वर्षांपासून संशाेधन सुरू आहे. किती टन साठा असेल, हे स्पष्ट नसले तरी काही सकारात्मक संकेत विभागाच्या संशाेधकांना मिळत आहेत.

निशांत वानखेडे

नागपूर : ‘शाेधाल तर सापडेल’ हे बाेधवाक्य घेऊन काम करणाऱ्या परमाणू खनिज अन्वेषण आणि संशाेधन संचालनालयाद्वारे (एएमडी) गाेंदियाच्या आमगाव जवळ ‘युराेनियम’च्या साठ्याबाबत मिळालेल्या संकेतानुसार गेल्या काही वर्षांपासून संशाेधन सुरू आहे. किती टन साठा असेल, हे स्पष्ट नसले तरी काही सकारात्मक संकेत विभागाच्या संशाेधकांना मिळत आहेत. यामुळे आण्विक ऊर्जा क्षेत्रात ही उपलब्धी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एएमडीचे संशाेधक धीरज सिंह यांनी सांगितले, गाेंदिया जिल्ह्यात ‘प्राेटेराेझाॅइक’ काळातील खडक आढळून आले हाेते. या खडकांमध्ये मुबलक प्रमाणात युरेनियम खनिज सापडते. त्यानुसार काही वर्षांपूर्वी या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. एएमडीच्या कार्य पद्धतीनुसार आधी हेलीबाॅर्न हवाई सर्वेक्षण, यानंतर भूसर्वेक्षणामध्ये रेडिओमेट्रिक, जिओफिजिकल व जिओकेमिकल सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर ड्रिलिंग करून काढलेल्या मूलद्रव्याचे प्रयाेगशाळेत विश्लेषण करण्यात येते व शेवटी किती टन साठा असू शकताे, यावर संशाेधन केले जाते. गाेंदिया जिल्ह्यात सध्या ड्रिलिंग करून काढलेल्या मूलद्रव्याचे प्रयाेगशाळेत अॅनालिसिस केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. युरेनियम आहे की नाही किंवा असेल तर किती टन आहे, हे सध्या सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सकारात्मक काही निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अशाच प्रकारचे सर्वेक्षण राजस्थानच्या जयपूरमध्येही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कुठे हाेताे युरेनियमचा उपयाेग?

युरेनियमचा सर्वात माेठा उपयाेग ऊर्जा निर्मितीसाठी हाेताे. साठा अधिक आढळल्यास ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात रेडिएशन व इतर कामासाठी, कृषी क्षेत्रात, उद्याेग क्षेत्रात आणि सिव्हेज डिस्पाेजलसाठी युरेनियमचा उपयाेग केला जाताे. माेठमाेठ्या बंदरावर साठलेली माती दूर करण्यासाठी युरेनियमचा उपयाेग केला जाताे.

देशात सर्वाधिक आंध्रप्रदेशात

आंध्रप्रदेश २,०८,८८५ टन, झारखंड ८०,१८५ टन हे दाेन सर्वाधिक युरेनियम उत्पादक राज्य आहेत. याशिवाय मेघालय २३,२६८ टन, तेलंगणा १८,५५० टन, राजस्थान १४,२९५ टन, कर्नाटक ७३०३ टन, छत्तीसगड ३९८६ टन, उत्तरप्रदेश ७८५ टन, हिमाचल प्रदेश ७८४ टन व महाराष्ट्रात ३५५ टन साठा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक