शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक धोकादायक, तर कीटकनाशक नाही का? शेतकऱ्यांना सरकारच्या बंदीचा फटका

By सुनील चरपे | Updated: June 16, 2025 14:31 IST

कॅन्सर होत असल्याचा दावा : पर्यावरणासाठी धोकादायक कोण? तणनाशक की सरकारचे धोरण?

सुनील चरपेनागपूर : राज्य सरकारने कापसाचे तणनाशक सहनशील बियाणे विक्री व वापर यावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. तणनाशक पर्यावरणाला हानीकारक आहे, असा दावा सरकारने केला आहे. या बियाण्यांची विक्री व वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविले जाते. शेतकरी तणनाशकांचा वापर पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी करतात. याच्या वापरामुळे मोठी झाडे किंवा झुडपे नष्ट होत नाही.

उलट, कीटकनाशकांमुळे फुलपाखरे, मधमाश्यांसह इतर मित्रकिडीच नव्हे तर माणसेदेखील मरतात. मग तणनाशकांच्या तुलनेत कीटकनाशकांमुळे पर्यावरण जैवविविधतेला धोका उद्भवत नाही का? पिकांची बियाण्याचा व तणनाशकाचा आपसात संबंध नाही. एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये बॅसिलस थुरिंगिएन्सिस जनुकासोबतच हर्बिसाइड टॉलरन्ट जनुके टाकलेली असतात. त्यामुळे एचटीबीटी कापसाच्या पिकात ग्लायफोसेट व इतर तणनाशकांची फवारणी केल्यास पीक सुरक्षित राहात असून, तण नष्ट होते. केंद्र सरकारने एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांवर बंदी घातली असली तरी गुजरात व तेलंगणामध्ये या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी या बियाण्याला प्राधान्य देतात. एचटीबीटी कापूस वगळता बीटी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर या व इतर पिकांच्या बियाण्यांमध्ये हर्बिसाइड टॉलरन्ट जनुके टाकलेली नसतात. या पिकांमधील तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी निवडक तणनाशके बाजारात उपलब्ध असून, शेतकरी त्यांचा नियमित वापर करतात. या बियाणे व तणनाशकांच्या उत्पादन व वापरावर केंद्र व राज्य सरकारने बंदी घातलेली नाही. यात वादग्रस्त ग्लायफोसेटचाही समावेश आहे.

ग्लायफोसेटला विरोधभारतीय पर्यावरणवाद्यांचा खरा विरोध आहे तो ग्लायफोसेट या तणनाशकाला! याचा आणि बियाण्याचा काहीही संबंध नाही. भारतात ग्लायफोसेटचे उत्पादन व वापर यावर बंदी नाही. सरकार एचटीबीटी कापूस बियाणे तसेच तणनाशके उत्पादक कंपन्यांवर कुठलीही कारवाई करीत नाही. तुरुंगात टाकले जाते ते एचटीबीटी कापूस बियाणे विक्रेते व शेतकऱ्यांना !

कॅन्सर होत असल्याचा दावातणनाशकांच्या वापरामुळे माणसांना कॅन्सर होत असल्याचा दावा पर्यावरणवादी, काही नेते व अधिकारी करतात. जगात ग्लायफोसेटचा वापर ७० वर्षांपासून केला जात आहे. तणनाशकांची सतत फवारणी करणाऱ्या सात कोटी लोकांपैकी एकास स्किन कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. जगात आजवर केवळ दोन व्यक्तींनी त्यांना तणनाशक फवारणीदरम्यान स्किन कॅन्सर झाल्याचा दावा करीत न्यायालयात दाद मागितली. ते दोघेही अमेरिकन आहेत. डब्ल्यूटीओने कॉफी आणि ग्लायफोसेटला एकाच कॅटेगरीत समाविष्ट केले आहे.

वैध व अवैध वृक्षतोडविकास कामांसह इतर बाबींसाठी सरकारने अलीकडच्या काळात संपूर्ण देशातील कोट्यवधी झाडे वैध व अवैधरीत्या तोडली आहेत. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण १.२९ गीगाटनने वाढल्याने तापमानात वाढ झाली. याचे परिणाम शेतातील मातीपासून तर पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांना भोगावे लागत आहे. मग या बाबी पर्यावरणाला धोकादायक नाहीत काय ?

टॅग्स :nagpurनागपूरfarmingशेतीFarmerशेतकरी