शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

तणनाशक धोकादायक, तर कीटकनाशक नाही का? शेतकऱ्यांना सरकारच्या बंदीचा फटका

By सुनील चरपे | Updated: June 16, 2025 14:31 IST

कॅन्सर होत असल्याचा दावा : पर्यावरणासाठी धोकादायक कोण? तणनाशक की सरकारचे धोरण?

सुनील चरपेनागपूर : राज्य सरकारने कापसाचे तणनाशक सहनशील बियाणे विक्री व वापर यावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. तणनाशक पर्यावरणाला हानीकारक आहे, असा दावा सरकारने केला आहे. या बियाण्यांची विक्री व वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविले जाते. शेतकरी तणनाशकांचा वापर पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी करतात. याच्या वापरामुळे मोठी झाडे किंवा झुडपे नष्ट होत नाही.

उलट, कीटकनाशकांमुळे फुलपाखरे, मधमाश्यांसह इतर मित्रकिडीच नव्हे तर माणसेदेखील मरतात. मग तणनाशकांच्या तुलनेत कीटकनाशकांमुळे पर्यावरण जैवविविधतेला धोका उद्भवत नाही का? पिकांची बियाण्याचा व तणनाशकाचा आपसात संबंध नाही. एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये बॅसिलस थुरिंगिएन्सिस जनुकासोबतच हर्बिसाइड टॉलरन्ट जनुके टाकलेली असतात. त्यामुळे एचटीबीटी कापसाच्या पिकात ग्लायफोसेट व इतर तणनाशकांची फवारणी केल्यास पीक सुरक्षित राहात असून, तण नष्ट होते. केंद्र सरकारने एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांवर बंदी घातली असली तरी गुजरात व तेलंगणामध्ये या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी या बियाण्याला प्राधान्य देतात. एचटीबीटी कापूस वगळता बीटी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर या व इतर पिकांच्या बियाण्यांमध्ये हर्बिसाइड टॉलरन्ट जनुके टाकलेली नसतात. या पिकांमधील तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी निवडक तणनाशके बाजारात उपलब्ध असून, शेतकरी त्यांचा नियमित वापर करतात. या बियाणे व तणनाशकांच्या उत्पादन व वापरावर केंद्र व राज्य सरकारने बंदी घातलेली नाही. यात वादग्रस्त ग्लायफोसेटचाही समावेश आहे.

ग्लायफोसेटला विरोधभारतीय पर्यावरणवाद्यांचा खरा विरोध आहे तो ग्लायफोसेट या तणनाशकाला! याचा आणि बियाण्याचा काहीही संबंध नाही. भारतात ग्लायफोसेटचे उत्पादन व वापर यावर बंदी नाही. सरकार एचटीबीटी कापूस बियाणे तसेच तणनाशके उत्पादक कंपन्यांवर कुठलीही कारवाई करीत नाही. तुरुंगात टाकले जाते ते एचटीबीटी कापूस बियाणे विक्रेते व शेतकऱ्यांना !

कॅन्सर होत असल्याचा दावातणनाशकांच्या वापरामुळे माणसांना कॅन्सर होत असल्याचा दावा पर्यावरणवादी, काही नेते व अधिकारी करतात. जगात ग्लायफोसेटचा वापर ७० वर्षांपासून केला जात आहे. तणनाशकांची सतत फवारणी करणाऱ्या सात कोटी लोकांपैकी एकास स्किन कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. जगात आजवर केवळ दोन व्यक्तींनी त्यांना तणनाशक फवारणीदरम्यान स्किन कॅन्सर झाल्याचा दावा करीत न्यायालयात दाद मागितली. ते दोघेही अमेरिकन आहेत. डब्ल्यूटीओने कॉफी आणि ग्लायफोसेटला एकाच कॅटेगरीत समाविष्ट केले आहे.

वैध व अवैध वृक्षतोडविकास कामांसह इतर बाबींसाठी सरकारने अलीकडच्या काळात संपूर्ण देशातील कोट्यवधी झाडे वैध व अवैधरीत्या तोडली आहेत. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण १.२९ गीगाटनने वाढल्याने तापमानात वाढ झाली. याचे परिणाम शेतातील मातीपासून तर पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांना भोगावे लागत आहे. मग या बाबी पर्यावरणाला धोकादायक नाहीत काय ?

टॅग्स :nagpurनागपूरfarmingशेतीFarmerशेतकरी