शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनं अल्पायुषी ठरतात का? संघर्षाचं फलित विजयोत्सवात का बदलत नाही?

By राजेश शेगोकार | Updated: November 3, 2025 15:46 IST

Nagpur : विदर्भात दि. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते त्यानंतर विदर्भात सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

नागपूर :विदर्भ हे महाराष्ट्राचं कृषिकेंद्र मानले जाते, पण इथे शेतकऱ्यांचा संघर्ष वर्षानुवर्षे कायम आहे. कर्ज, हवामान बदल, बाजारातील अन्यायकारक दर, आत्महत्यांचे आकडे अशी सगळी गोळाबेरीज राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत येतं, आंदोलनं होतात, घोषणाही होतात. तरीही, प्रत्येक आंदोलन काही दिवसांनी शांत होतं. प्रश्न तोच राहतो विदर्भातीलशेतकरी आंदोलनं अल्पायुषी ठरतात का? या आंदोलनांचे संघर्षाचे फलित चर्चेत, समित्यांमध्ये अन् आश्वासनांतच का हरविले जाते. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नागपुरात केलेले आंदोलन व त्याचे फलित या पृष्ठभूमीवर ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

विदर्भात दि. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते त्यानंतर विदर्भात सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. देशभर गाजले. यादरम्यान जवळपास प्रत्येक पक्षाने सत्तेची फळे चाखली पण शेतकऱ्याच्या नशिबाचे भोग संपले नाहीत. खरिपाचा हंगाम संपला अन् शेतमाल घरात आल्यावर सरकार नावाची यंत्रणा अटी अन् शर्थीची मेख मारून ठेवते, त्यामुळे शेतकऱ्याला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

शरद जोशी या लढवय्या नेत्याने शेतकऱ्यांची तादक दाखविणारे लाखोंचे मेळावे घेतले. शेगावातील ऐतिहासिक मेळाव्यात अचानक रेल्वे रोकोची घोषणा करून प्रशासनाची तारांबळ उडवली, अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या आंदोलनात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा सहभागी झाले अन् हे आंदोलन राष्ट्रीयस्तरावर पोहोचले, अलीकडच्या काळात बच्चू कडू, रविकांत तुपकर यांचीही आंदोलने अशीच तीव्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालण्याची हातोटी, आक्रमकता यामुळे लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी होतात, सरकार पुढाकार घेते, दखल घेते व सुरू होतो प्रशासन नावाच्या अजगराचा खेळ.

सरकारची ही जुनी रणनीती नव्या स्वरूपात पुढे येते शेतकरी नेते बोलावले जातात, समित्या स्थापन होतात, आश्वासनांची यादी तयार होते. पण त्यानंतर एखादा अहवाल, काही महिन्यांची मुदत मिळते व आंदोलनकर्त्यांचा उत्साह ओसरतो. विदर्भातील शेतकरी रोजंदारीवर जगतो; महिनाभर रस्त्यावर बसणं त्याच्यासाठी शक्य नाही. त्यामुळे तो काहीकाळाने अर्धवट आश्वासनावर परत शेतात जातो. सरकार काही वेळा अंशतः मदत जाहीर करतं 'आकस्मिक मदत', 'बोनस', 'कर्जवाटप' व कर्जमुक्तीकडे वाटचाल अशा घोषणांनी वातावरण शांत केलं जातं. प्रत्यक्षात अंमलबजावणी विलंबते, पण आंदोलनकर्त्यांचा विश्वास बसतो की काहीतरी मिळालं. आर्थिक अडचणींमुळे त्यांना आंदोलन चालू ठेवणं कठीण जाते व संघर्षाची ज्योत नेहमीच अशा तात्पुरत्या सवलतींनी विझवली जाते. शहरी लोकांनाही शेतकऱ्यांचा प्रश्न 'त्यांचा मुद्दा' वाटतो, 'आपला प्रश्न' नाही. त्यामुळे आंदोलनाला व्यापक लोकसहभाग मिळत नाही.

समाजाची उदासीनता हीच या संघर्षाची सर्वात मोठी शत्रू ठरते. प्रत्येक आंदोलन आशा निर्माण करतं, पण परिणाम न दिसल्याने ती आशा पुन्हा निराशेत बदलते. ही सारी प्रक्रिया सरकार संथगतीने हाताळत असते मग सरकार कोणाचेही असो त्यामुळेच कदाचित विदर्भातील शेतकरी आंदोलनं अल्पायुषी ठरतात. ती भावनेवर सुरू होतात, पण संघटित धोरणावर संपत नाहीत हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.

शासनाच्या आश्वासनांनी आणि सामाजिक उदासीनतेने आंदोलनाची ऊर्जा वितळते हे वास्तव असलेले तरी अशाच आंदोलनांनी विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत ठेवला आहे हे सत्य नाकारता येत नाही किंबहुना हीच त्यांची खरी ताकद आहे. विदर्भाचं भविष्य संघटित जागृतीत आहे. कारण प्रत्येक शांततेच्या मागे अजून एक आक्रोश दडलेला असतो आणि तोच पुढच्या संघर्षाचा बीज ठरतो. विदर्भाच्या मातीत अजूनही ताकद आहे फक्त ती आशेच्या नव्या बियाण्याने पुन्हा पेरायची आहे 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Farmer Protests: Why Short-Lived? Struggles Don't Translate to Victory?

Web Summary : Vidarbha farmer movements often fade despite initial fervor. Unfulfilled promises, financial constraints, and societal apathy hinder lasting change, keeping farmers' issues alive.
टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनfarmingशेतीFarmerशेतकरीVidarbhaविदर्भnagpurनागपूर