शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 8:30 PM

विधान परिषदेत बुधवारी विरोधी बाकांवरील सदस्यांकडून कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी पीकविम्याच्या मुद्यावरून विरोधकांनी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करा, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देविरोधकांची मागणी : पीकविम्यावरून शासनावर टीका

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेत बुधवारी विरोधी बाकांवरील सदस्यांकडून कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी पीकविम्याच्या मुद्यावरून विरोधकांनी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करा, अशी मागणी करण्यात आली.धनंजय मुंडे, शरद रणपिसे, सुनील तटकरे यांच्यासह विविध सदस्यांनी विधान परिषदेत निमय २६० अन्वये प्रस्ताव मांडला. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना २०१६-१७ या वर्षाचा पीकविमा वितरित करण्यात आला नाही. खासगी बँकांकडूनदेखील शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शिवाय आॅनलाईन अर्जांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून यामुळे इतरांना मात्र व्यवसाय मिळाला आहे, असे पंडित म्हणाले. रामहरी रुपनवर यांनी तर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, अशी मागणीच केली. देशातील ४ ते ५ राज्यांमध्ये अशी योजना आहे. त्यामुळे तेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाणदेखील कमी आहे. राज्यानेदेखील यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. तूर डाळी ठेवण्यासाठी राज्यात गोदामे कमी पडत आहेत, अशा स्थितीत बाहेरून डाळ का आयात करण्यात आली, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांपर्यंत कृषीबाबतच्या विविध योजनांची माहिती तत्काळ पोहोचावी, यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे परिषद दोनदा स्थगितदरम्यान, अमरसिंह पंडित यांनी प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली असता राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. संवेदनशील व अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना एकाही विभागाचा सचिव अदृश्य दालनात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचेच यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. सचिवांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, असे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपसभापतींनी दोनदा सभागृहाचे कामकाज १५-१५ मिनिटांसाठी तहकूब केले. अखेर सचिव पोहोचल्यानंतरच कामकाजाला सुरुवात झाली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Farmerशेतकरी