शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

१०० सार्वजनिक गणेश मंडळांचे अर्ज : सुरक्षेबाबत आयुक्तांनी केली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:42 IST

कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक तसेच शांतता समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

ठळक मुद्देशांतता समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक तसेच शांतता समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.गणेशोत्सव राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि हे महापर्व १० दिवस चालते. नागपूर शहरातही दरवर्षी शेकडो मंडळे गणेशोत्सवासाठी अर्ज करतात. गेल्या वर्षी हा आकडा ९८३ होता. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे केवळ १०० मंडळांनी श्रींच्या स्थापनेसाठी पोलीस विभागाकडे अर्ज केला आहे. ही संख्या २०० ते २५० पर्यंत जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम करण्यासाठी ही चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या ११ जुलैच्या परिपत्रकानुसार उत्सव साजरा करण्यात येईल, असे शांतता समितीच्या सदस्यांना स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक मूर्ती ४ फूट व घरगुती गणेश मूर्ती २ फुटाची राहील. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र गोळा होता येणार नाही. पूजा किंवा आरतीदरम्यान गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. दर्शनाच्या वेळी सॅनिटायझर व मास्क वापरण्यासह शारीरिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील. विसर्जनाची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.कृत्रिम टँकमध्येच करावे लागेल विसर्जनगणेश मंडळांनाही जवळच्या कृत्रिम टँकमध्येच विसर्जनाची परवानगी असेल. विसर्जनाची समस्या नसावी म्हणून मातीच्या मूर्तीऐवजी धातूची मूर्ती ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सांस्कृतिक आयोजनालाही बंदीसार्वजनिक गणेश मंडळातर्फे सांस्कृतिक आयोजन केले जाते पण यावर्षी अशा सर्व आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी अधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांना उत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे पालन करण्याचे आवाहन केले. सुरक्षित अंतर ठेवणे आणि गर्दीपासून दूर राहणे हेच कोविडपासून बचावाचे उपाय आहेत. शांतता समितीच्या सदस्यांनी नागरिकांना जागरूक करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. बैठकीत सहपोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्यासह सर्व सहआयुक्त व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयonlineऑनलाइन