शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अनियंत्रिक कारच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2022 14:49 IST

वर्धा मार्गावर घटना

नागपूर : वर्धा मार्गावर अनियंत्रित कार रस्ता दुभाजक आणि विजेच्या खांबाला धडकल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचे चार मित्र जखमी झाले. एअरफोर्स ऑफिसर मेसजवळ शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. गौरव राघोर्ते असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. या अपघातात देवेश निघोट, वेदांत उदापुरे, तन्मय मेटांगले आणि अमन यादव हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचे पाचही मित्र सकाळी शुल्क भरायला महाविद्यालयात गेले होते. त्यानंतर ते त्यांच्या मित्राच्या फ्लॅटवर गेले. तेथून दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते महाविद्यालयातून नागपूरच्या दिशेने निघाले. एमएच ४९-एएस ३६०३ या क्रमांकाच्या कारने ते येत होते. एअर फोर्स ऑफिसर्स मेससमोर कार अचानक अनियंत्रित झाली व गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढली. यानंतर दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबाला धडकून कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली. कारचा वेग जास्त असल्याने आतील सर्व विद्यार्थी जखमी झाले. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. बेलतरोडी पोलीस तत्काळ तेथे पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना एम्समध्ये नेले. उपचारादरम्यान गौरव राघोर्ते याचा मृत्यू झाला, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. कारचा अपघात कसा झाला याचा बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

गौरव हा कामठीचा रहिवासी होता व दररोज तेथून महाविद्यालयात यायचा. अतिशय हुशार असलेल्या गौरवने जेईईमध्ये चांगले गुण प्राप्त करत महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने अपघात ?

घटनास्थळावर जाऊन कारची पाहणी केली असता, कारचा चेंदामेंदा झाला होता. शिवाय कारचे समोरचे चाक पंक्चर होते. चाक पंक्चर झाल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले व त्यातून अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी सांगितला.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू