शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपुरात दर महिन्याला सरासरी ८४४ गंभीर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:29 IST

२०२४ मध्येही गुन्ह्यांची सरासरी कायम : हत्या, विनयभंग, अत्याचारांची आकडेवारी चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत नवीन वर्षात गुन्ह्यांचा दर कमी होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात २०२३ च्या तुलनेत या वर्षी गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी दर महिन्याला सरासरी ८३३ गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा हा आकडा सरासरी ८४४ वर गेला आहे. २०२१ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर हा सर्वाधिक आकडा आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे शहरातील गंभीर गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. २०२१ पासून ते मार्च २०२४ या कालावधीत नागपुरात किती गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले, हत्या अत्याचार-विनयभंग-फसवणूक यांचे प्रमाण किती होते याबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपुरात जानेवारी ते मार्च या कालावधीत २ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. याची सरासरी महिन्याला ८३३ इतकी होत आहे. २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात ९ हजार ९९९ गुन्हे नोंदविल्या गेले होते. तर, २०२१ मध्ये ८ हजार २३२ व २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

मागील काही काळापासून नागपुरात हत्यांच्या प्रकरणांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत नागपुरात २० हत्यांची नोंद झाली. २०२३ मध्ये पूर्ण वर्षभरात ७९ हत्या झाल्या होत्या.

*अशी आहे गुन्ह्यांची आकडेवारीगुन्हा                                     २०२१                     २०२२                      २०२३                      २०२४ मार्चपर्यंत हत्या                                     ९५                             ६५                           ७९                              २०चोरी                                     २५९०                       २५०३                       ३५०५                           ७६८फसवणूक                              ४८८                         ४९२                         ६६०                            १७९दंगे                                         १५२                          ७६                           ११५                              ४०अत्याचार                               २३४                          २५०                         २६३                              ७२विनयभंग                               ३५६                         ३४०                          ५०६                             ११४

महिला अत्याचारावर नियंत्रण कसे येणार ?

महिला अत्याचारांचा मुद्दा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. २०२३ मध्ये नागपुरात वर्षभरात महिला अत्याचाराच्या २६३ गुन्ह्यांची नोंद झाली होती व दर महिन्याची सरासरी २२ गुन्हे इतकी होती. या वर्षी तीनच महिन्यांत ७२ गुन्हे नोंदविले गेले असून, प्रतिमहिना सरासरी २४ इतकी आहे. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांतवरदेखील फारसे नियंत्रण आलेले नाही. २०२३ मध्ये विनयभंगाचे ५०६ गुन्हे नोंदविल्या गेले होते व दर महिन्याची सरासरी ४२ इतकी होती. या वर्षी तीनच महिन्यांत ११४ गुन्ह्यांची नोंद झाली असून दर महिन्याला विनयभंगाचे सरासरी ३८ गुन्हे दाखल झाले आहेत

निवडणुकांच्या वर्षात दंगे वाढीस२०२४ हे निवडणुकीचे वर्ष असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, पोलिसांच्या आकडेवारीनुसार तीन महिन्यांत दंग्यांच्या घटना वाढीस लागल्या. २०२३ मध्ये दंगलीच्या कलमांतर्गत ११५ (प्रति महिना १०) गुन्हे दाखल झाले होते. या वर्षी हा आकडा ४० (प्रति महिना १३) इतका आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीtheftचोरी