शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत शुक्रवारी सर्वाधिक ४५.५ डिग्री तापमान

By admin | Updated: May 24, 2014 01:09 IST

विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमानाने ४५ डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे झेप घेतली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असताना हवामान खात्याने येत्या ४८

वादळी पावसाची शक्यता : हवामान तज्ज्ञांचा इशारा

अमरावती : विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमानाने ४५ डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे झेप घेतली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असताना हवामान खात्याने येत्या ४८ तासांत पुन्हा वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. पावसाच्या आगमनामुळे उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विदर्भात गेल्या काही दिवसांत तापमानात मोठा बदल जाणवला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ४४ अंशावर गेले होते. त्यानंतर पावसाच्या सरीदेखील कोसळल्या. त्यामुळे चार ते पाच दिवस तापमान कमी झाले. मे महिन्याच्या सुरुवातीला ४० ते ४२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे उकाडा निर्माण झाला होता. मात्र, मे महिन्याच्या २० तारखेनंतर तापमान वाढले आहे. शुक्रवारी २३ मे रोजी अमरावतीमध्ये ४५.५ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात ढगाळ वातावरण आहे. या स्थितीला ‘डिप्रेशन’ असेही म्हटले जाते. कमी दाबाच्या पट्टयामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून ते वार्‍याच्या दिशेने विदर्भाकडे वळले आहे. यामुळे येत्या ४८ तासांत वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकंनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. यंदा मान्सून १० जूनच्या जवळपास धडकण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)