शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेआरक्षण कार्यालयात दिवसभर शुकशुकाट : केवळ १३० तिकिटांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:32 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

ठळक मुद्देप्रवासी निघाले नाहीत घराबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचेआरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १ जूनपासून सुरु होणाऱ्या १०० जोडी रेल्वेगाड्यांची तिकिटे आज आरक्षण खिडक्यांवरून देण्यात आली. परंतु खूप कमी प्रवासी आरक्षणासाठी आले तर बहुतांश नागरिक आपले तिकीट रद्द करण्यासाठी आले होते.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वे स्थानकावर दोन आरक्षण खिडक्या सुरु करण्यात आल्या होत्या. या खिडक्यांवरून केवळ ४२ तिकिटांची विक्री झाली. यामुळे रेल्वेला केवळ ४२ हजार ८५० रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजनीच्या आरक्षण कार्यालयातून केवळ १० तिकीट विकल्या गेले. यातून १० हजार ८९० रुपये मिळाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकावरून ७८ तिकीट विकल्या गेले. यातून विभागाला ४९ हजार ५२० रुपयांचे उत्पन्न मिळाले. सोबतच ४७ हजार ८६० रुपयांचा परतावा जुन्या तिकिटांवर प्रवाशांना देण्यात आला. याशिवाय राजनांदगाव स्थानकाच्या आरक्षण कार्यालयातून १२ तिकिटांच्या विक्रीतून ४९२० रुपये मिळाले. तर २ तिकिटे रद्द केल्यामुळे ३३३५ रुपये प्रवाशांना परत करावे लागले. डोंगरगडमध्ये ३ तिकिटे विकल्याने २८९० रुपयांचे उत्पन्न झाले. तर २ तिकिटे रद्द केल्यामुळे २३६० रुपये परत करावे लागले. भंडारा रोड स्थानकावरून ४ तिकिटांच्या विक्रीतून २ हजार रुपये उत्पन्न झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेreservationआरक्षण