शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अजित पवारांचा ‘यू टर्न’ : ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:40 IST

काही दिवसाअगोदर ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षातील नेते ‘ईव्हीएम’विरोधात असताना पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. या मशीनमध्ये सरसकट दोष आहे असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देलोकशाहीत पराभव स्वीकारता आला पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही दिवसाअगोदर ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षातील नेते ‘ईव्हीएम’विरोधात असताना पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. या मशीनमध्ये सरसकट दोष आहे असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत जर दारुण पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. ‘ईव्हीएम’मध्ये काही त्रुटी असती तर ती कुणीतरी सिद्ध करुन दाखविली असती. निवडणूक आयोगाने आवाहन केल्यानंतरदेखील कुणीही यासाठी समोर आले नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी तांत्रिक दोष असू शकतो. मात्र संपूर्ण ‘ईव्हीएम’ यंत्रणा सदोष आहे, असे म्हणता येणार नाही. जर ‘ईव्हीएम’मध्ये दोष असा तर भाजपचा सर्वच राज्यात विजय झाला असता. मात्र पंजाब, कर्नाटकमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अगदी बिहार, गुजरातमध्येदेखील ‘ईव्हीएम’ असतानादेखील त्यांच्या तोंडाला फेस आला होता. २०१४ मध्ये जनतेने भाजपला नव्हे तर नरेंद्र मोदी यांना मत केले होते, असे अजित पवार म्हणाले.शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावीराज्यात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्य शासन ते मान्य करायला तयार नाही. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात जलयुक्त शिवारचा बोलबाला झाला. मात्र अनेक ठिकाणी भूजल पातळी ही एक ते दीड मीटरने खालावली आहे. शेतकऱ्यांची स्थिती पाहता त्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.सरकारने ‘फिल्ड’वर यावेमुख्यमंत्री दररोज विविध जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. मात्र दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिले पाहिजे. तसेच घोषणांचे प्रत्यक्ष शासन निर्णय लगेच निर्गमित झाले पाहिजेत, असे पवार म्हणाले. राज्यातील उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना ‘सीएसआर’चा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी खर्च करण्यास सांगितले पाहिजे. शासनाने लोकप्रतिनिधींंना विश्वासात घेऊन पाण्याच्या वाटपाबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे मतदेखील पवार यांनी व्यक्त केले.महाआघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा सुरूपुढील लोकसभा निवडणूकांसाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत हातमिळावणी केली आहे. मात्र याचा फायदा भाजपा-शिवसेनेला होईल. त्यामुळे त्यांना महाआघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही चर्चा करत असून आमची आशा कायम आहे, असे अजित पवार यांनी प्रतिपादन केले. मनसेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व मित्रपक्षांना जे मान्य असेल ते आम्ही ठरवू, असेदेखील ते म्हणाले.शिवस्मारकाची उंची कमी करू नयेशिवस्मारकावरुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन वर्षानंतरदेखील कामाला विलंब लागत असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. जनतेच्या भावनांंशी जुळलेला हा विषय आहे. याला धक्का पोहोचविण्याची कृती भाजपा-शिवसेनेने करू नये असा इशाराच यावेळी अजित पवार यांनी दिला.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnagpurनागपूर