शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

उपमुख्यमंत्री पवारांकडून दिलगिरी, काैतुक अन् कानपिचक्यांसह टोमणेही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 11:00 IST

एकीकडे पोलिसांचे काैतुक केले तर, दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्या देऊन टोमणेही हाणले. त्याचमुळे आता ‘दादां’ना म्हणायचे तरी काय, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला आहे.

ठळक मुद्देपोलीस अधिकारी आणि एनआयटीवर नाराजी व्यक्त ‘अर्थपूर्ण’ भाषणामुळे अनेक जण चमकले

नरेश डोंगरे

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस भवनाच्या उद्घाटन समारंभात केलेले ‘अर्थपूर्ण’ भाषण अनेकांना चमकवणारे ठरले आहे. त्यांनी माइकवर येतायेताच उशिरासाठी नागरिकांसमोर दिलगिरी व्यक्त केली. एकीकडे पोलिसांचे काैतुक केले तर, दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्या देऊन टोमणेही हाणले. त्याचमुळे आता ‘दादां’ना म्हणायचे तरी काय, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठांना चांगली वर्तणूक देत नसल्याचे दादांना कळले असावे म्हणून त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांचे कान टोचले. तुम्हीही कधीकाळी कनिष्ठ होता, हे विसरू नका. विशिष्ट ‘जागेसाठी’ काही जण हट्ट धरतात, हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीचे आणि पोलीस भवनच्या देखण्या वास्तूच्या दर्जेदार बांधकामाबद्दल त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, अर्चना त्यागी अन् पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे काैतुक केले. मात्र, एनआयटीला पुरेसा निधी देऊन काम समाधानकारक नाही, असे सांगत ‘हे खपवून घेतले जाणार नाही’, असा इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

सराफा व्यापाऱ्याला भोसकून साडेतीन कोटींचा ऐवज लुटण्याच्या गुन्ह्याचा अवघ्या २७ तासांत छडा लावल्याबद्दल त्यांनी शहर पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली. जप्त केलेला ऐवज सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दादा आणि वळसे पाटलांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी पोलीस दलाच्या परिश्रमाची प्रशंसा करून त्यांचे आभार मानले. हा धागा पकडून त्यांनी त्यांच्या शैलीत सराफा व्यापाऱ्यांनाही सल्ला दिला. पोलीस सर्वांसाठीच काम करतात. मग, त्यांची काळजीही सर्वांनीच घ्यायला हवी. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री डीपीसीतून निधी देतात की नाही, याची उपमुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच शहानिशा करून घेतली.

माजी गृहमंत्र्यांचे आभार

पोलिसांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आठवण काढली. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख यांचे आभार मानले.

‘मास्क’चा खुलासा

उपमुख्यमंत्र्यांनी आज मास्क काढून भाषण केले. ते म्हणाले, आता कोरोनाची तेवढी भीती नसल्याने आपण दोन वर्षांत पहिल्यांदाच विनामास्कने भाषण करीत आहे. मात्र, तरीही काळजी घ्यावीच लागेल, असे म्हणत त्यांनी आता येथून बाहेर पडताच मी मास्क लावेन, असे सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnagpurनागपूरPoliceपोलिस