शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अबब.. नागपूर ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ३९ हजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:33 IST

मनमानी दरामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ

नागपूर : विमानांच्या तिकीट दराच्या स्पर्धेत आता सर्वच कंपन्यांनी मनमानी सुरू केली आहे. एअर इंडियाचे मंगळवारी, २३ मे रोजी सकाळी ७:३० वाजता मुंबईला जाणाऱ्या विमानात रिक्त असलेल्या ‘ए’ दर्जाच्या दोन जागेपैकी एकाचे तिकीट ३९ हजार रूपये आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तिकिटाचे हे दर एअर इंडियाच्या सिस्टिमवरही दर्शविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या मनमानी दरामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-६२८ विमान मंगळवारी सकाळी ७:३० वाजता नागपुरातून मुंबईला जाते. या विमानातील दोन वगळता सर्वच तिकिटा बुक होत्या. अत्यावश्यक कामासाठी मुंबई जाण्यासाठी एअर इंडियाच्या तिकिटाची विचारपूस केलेल्या एका प्रवाशाला ‘अ’ दर्जाच्या दोन तिकीट रिक्त असल्याचे समजले. चौकशी केली असता एका तिकिटाचे दर ३९ हजार रूपये आकारण्यात येत असल्याचे कळताच ते अचंबित झाले. एवढेच नव्हे तर या दराबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. नागपुरातून मुंबईला मंगळवारी जाणाऱ्या अन्य विमान कंपन्यांचे दर सोमवारी सिस्टिमवर ८ ते १० हजार रूपये दर्शविण्यात आले होते. यावरून विमान कंपन्यांच्या दरावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

काही महिन्यांआधी सरकारचा उपक्रम असलेली एअर इंडियाची मालकी आता टाटा समूहाकडे गेली आहे. कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर असे पहिल्यांदा घडले आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाticketतिकिटnagpurनागपूरMumbaiमुंबईairplaneविमान