शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 15:16 IST

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नागपूर : यशोधरानगर हद्दीतील प्रवेशनगरात शुक्रवारी दुपारी अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील सर्व साहित्य जळाले. परंतु अगरबत्ती तयार करताना आवश्यक असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग विझविता विझविता अग्निशमन पथकाच्या नाकीनऊ आले. दुपारी १२ वाजता लागलेली आग सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत धुमसत होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हा अगरबत्ती भर कारखाना वस्तीत होता. दुपारी कारखान्यात कामगार काम करीत होते. १२.२० वाजताच्या सुमारास आग लागल्याने कामगार व शेजाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. लोकांनी आग विझविण्यासाठी सुरुवातीला पाणीही टाकले; पण कारखान्यात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका चांगलाच वाढला होता. 

अग्निशमन विभागाला आगीची सूचना मिळाल्याबरोबरच पाण्याच्या पाच टँकरसह ८ वाहने घटनास्थळी दाखल झाले. ३ हजार चौरस फुटात असलेल्या कारखान्याला आगीने कवेत घेतले होते. पथकाने आगीचा प्रभाव कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. आगीच्या ज्वाला आणि भडके थांबविण्यात यशही आले; पण कारखान्यात असलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे धुसफुस सुरूच होती. अग्निशमन विभागाचे पथक सायंकाळपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. जेसीपीद्वारे साहित्य बाहेर काढण्यात आले.

चार दुचाकीही जळाल्या

या आगीत कारखान्याजवळ असलेल्या ४ दुचाकी जळाल्याची माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा पंचनामा विभागाकडून केला जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

वस्तीत भीती

कारखाना अगदी भर वस्तीत आहे. लागूनच घरेही होती. त्यामुळे आग वस्तीत पसरण्याचाही धोका होता. धुराचे लोट आकाशात झेपावलेले पहाताना वस्तीमधील लोकांच्या मनात दहशत जाणवत होती. मात्र सुदैवाने जवानांनी आग पसरू दिली नाही. यामुळे अनर्थ टळला.

टॅग्स :Accidentअपघातfireआगnagpurनागपूर