शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

- नेपाळ येथून ड्युटी फ्री आयात वाढली : आठ महिन्यांच्या तुलनेत भाव जास्तच नागपूर : पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे खाद्यतेलाच्या ...

- नेपाळ येथून ड्युटी फ्री आयात वाढली : आठ महिन्यांच्या तुलनेत भाव जास्तच

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे खाद्यतेलाच्या दराने काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठला होता. पण गेल्या काही दिवसांपासून मागणीच्या तुलनेत जास्त पुरवठा, विदेशात कच्चे सोयाबीन व पाम तेलाचे उतरलेले दर आणि एक महिन्यापासून नेपाळमधून सीमा शुल्क फ्री कच्चे सोयाबीन व पाम तेल भारतात येत असल्याचा परिणाम खाद्यतेलाच्या दर घसरणीवर झाला. सोयाबीन तेलाच्या प्रति किलो किमतीत १३ ते १५ रुपये, पाम तेल १५ रुपये, सूर्यफूल १५ रुपये आणि शेंगदाणा तेलात १० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या दर कमी झाले असले तरीही नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत दर वाढलेले आहेत. नोव्हेंबरमध्ये सोयाबीन प्रति किलो ९५ रुपये, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाचे दर प्रत्येकी १२० रुपये किलो होते. त्यामुळे तेलाचे दर कमी झाले असे म्हणणे चुकीचे आहे. पण दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरीही दर आणखी कमी व्हावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.

इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, महिन्यापूर्वी खाद्यतेलाच्या दराने उच्चांक गाठला होता. हा उच्चांक तोडण्याचे काम नेपाळने केले आहे. तसे पाहता भारतात सोयाबीनवर ३२.५ टक्के, पामवर २७ टक्के आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर ३२ टक्के सीमाशुल्क आकारले जाते. याशिवाय सेससुद्धा आकारला जातो. प्रत्येक लीटरमागे उपरोक्त टक्के शुल्क चुकवावे लागते. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढतात. पण नेपाळमधून झिरो ड्युटी फ्री सोयाबीन व पाम तेल मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात होत असल्याने तेलाचे भाव कमी झाले आहेत. आकडेवारीनुसार नेपाळने एप्रिलमध्ये २ लाख १५ हजार टन कच्चे सोयाबीन तेल आणि ३ हजार टन कच्च्या पामची निर्यात केली आहे. परिणामी तेलाच्या उपलब्धतेमुळे भाव कमी झाले. यंदा मान्सून चांगला येण्याच्या शक्यतेने भाव आणखी कमी होतील. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू झाली आहेत. मागणी वाढल्यानंतरही तेलाचे भाव कमी झाले आहेत. नेपाळमधून निर्यात वाढल्यास भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाचे दर (प्रती किलो)

आधीचे आताचे

सूर्यफूल १९० १७५

सोयाबीन १६५ १५२

शेंगदाणा १८० १७०

पाम १६० १४५

मोहरी १८० १७०

राईस ब्रान १६५ १५०

जवस १८० १६८

शेतकऱ्याच्या घरातही विकतचे तेल :-

पूर्वी शेतात तेलबियांचे पीक घेतले जायचे. त्यापासून काढलेले घाण्याचे तेलच घरात वापरले जायचे. शिवाय विक्रीही करायचो. पण पिकाची टक्केवारी कमी झाल्याने पीक बाजारात विकतो आणि बाजारातून आवश्यक तेवढेच खाद्यतेल विकत घेतो.

वासुदेव आंबटकर, शेतकरी.

शेतात सोयाबीनचे पीक घेण्यात येते. पूर्वी सोयाबीनपासून घरच्या घाणीवर तेल काढत होतो. पण आता परवडत नाही. त्यामुळे पीक बाजारात विकतो. स्वयंपाकघरात लागणारे तेल बाजारातून विकत घेतो. सध्या तेलबियांचे पीक कमी झाले आहे.

कैलास ठाकरे, शेतकरी.