शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

तुळशी विवाहनंतर वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 8:42 PM

विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यात १४ विवाह मुहूर्त : मंगल कार्यालय झाले फुल्ल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जून महिन्यापासून थांबलेल्या विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे. विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.दोन मनांचे मिलन घडविणारा आणि दोन कुटुंबाना जोडणारा विवाह संस्कार सोहळा समीप आला आहे. तुळशी विवाहाला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. १२ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. साधारणत: तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासून विवाहांना सुरुवात केली जाते. त्या अनुषंगाने ९ नोव्हेंबरपासूनच लग्नाचा पहिला बार फुटणार आहे.गेल्यावर्षी गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली होती. नागपुरातील प्रसिद्ध पंचांगानुसार नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे ७ मुहूर्त असून मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग आधीच करण्यात आले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिने मिळवून १४ शुभ मुहूर्त आहे. तसे वेगवेगळ्या पंचांगानुसार विवाहाचे मुहूर्त कमी जास्त आहे. डिसेंबरच्या १२ तारखेपासून गुरूचा अस्त असल्यामुळे थेट जानेवारीच्या १८ तारखेलाच विवाह मुहूर्त असल्याचे प्रसिद्ध ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.त्या दृष्टिकोनातून शहरातील मंगल कार्यालय फुल्ल झाले आहे. शहरात साधारणत: दोनशेच्या जवळपास मंगल कार्यालय आहेत. लॉनचीही संख्या बरीच आहे. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचे बुकिंग झाले आहे. मे आणि जूनचे बुकिंग सध्या सुरू आहे, असे मंगल कार्यालयाचे मालक देवदत्त फडणवीस यांनी सांगितले. नागपूरच्या प्रसिद्ध पंचांगानुसार असे आहेत मुहूर्तनोव्हेंबर ९,१०,११,१४, २०,२३,२८डिसेंबर १,२,३,६,८,११,१२जानेवारी, १८,२०,२९,३०,३१फेब्रुवारी १,४,१२,१४,१६,१८,२६,२७मार्च ३,४,११,१२,१९एप्रिल १५,१६,२६,२७मे २,५,६,८,१२,१४,१८,१९,२४,जून १४,१५,२९,३०पुढे जुलै ते ऑक्टोबरपर्यंत मुहूर्त नसल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. शुभ मुहूर्त म्हणजे चांगली वेळविवाह मुहूर्तासाठी केवळ तारखेलाच महत्त्व नाही तर त्या दिवशीची वेळ कशी आहे याला महत्त्व असते. चंद्र, शुक्र, गुरु, बुध हे शुभ ग्रह आहे. त्यांची दिशा यावरून मुहूर्त ठरतो. विवाह मुहूर्तात जी घटिका काढली जाते, तिला महत्व असते. शास्त्रात मुहूर्ताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पत्रिकेवर जी वेळ दिली आहे, ती वेळ प्रत्येकाने पाळल्यास, विवाहाचा शुभ सोहळा शुभ ठरतो, असे डॉ. अनिल वैद्य म्हणाले.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर