शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

फेरबदलानंतर ‘ते’ नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

By कमलेश वानखेडे | Updated: October 7, 2023 15:14 IST

वडेट्टीवार म्हणाले, हे तीन जणांचे घोटाळेबाजांचे सरकार

नागपूर : गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही त्यांना शुद्ध करून, गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. पण ‘डाग जरा जिद्दी है’ अशी परिस्थिती या नऊ मंत्र्यांची झालेली आहे. त्यांची नावे मी आता जाहीर करून शकत नाही. मात्र, मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतर हे नऊ मंत्री मंत्रीमंडळात नसतील, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये या भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावेच लागेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.

वडेट्टीवार म्हणाले, हे तीन जणांचे घोटाळे बाजांचे सरकार आहे. हे मंत्री पूर्णतः लुटमार करणारे आहेत. यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे यांना पंधरा दिवसांच्या आत काढावेच लागेल. नाहीतर यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही जनतेसमोर मांडल्या शिवाय राहणार नाही. या सर्वावर आम्ही आरोप लावलेले नाहीत. तर भाजपनेच आरोप लावलेले आहेत. त्यांच्या नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीनंतरच यांच्यावर गुन्हे दाखल झालेत किंवा चौकशी किंवा ईडी ने नोटीस बजावलेल्या आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यावर न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलेसे आहे आणि त्याचा निरक्षणातून हे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना एक मिनिट सुद्धा पदावर ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली. इंडियाच्या जागा वाटपाचे सूत्र दिल्लीतच ठरत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागवार पदाधिकांच्या बैठका घेणं सुरू केले आहे. १२ तारखेला त्याची बैठक नागपूर मध्ये होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

१६ आमदारांवर कारवाई होणारच

त्या आमदारांवरती कारवाई होणारच आहे. फक्त आजचं मरण उद्या वरती चालढकल चालली आहे. कायद्यातून कोणी वाचवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार नेहमीच नाराज असतात

- अजित पवार नेहमीच नाराज असतात. ही त्यांची ‘टॅक्टिस’ आहे. नेहमी नाराज असल्याचे दाखवणे आणि आपले वर्चस्व कायम करणे, हे त्यांचे कौशल्य आहे. ते आमच्या मंत्रिमंडळातही होते. तेव्हाही त्यांनी तेच केले. कधी नॉट रिचेबल, कधी स्विच ऑफ , तर कधी त्यांना ताप आलाय. हे सगळी राजकीय बिमारी असल्याचा चिमटा वडेट्टीवारांनी काढला

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा