शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

माेठा खंड पडल्यानंतर विदर्भात धुवांधार बरसल्या श्रावणसरी

By निशांत वानखेडे | Updated: August 13, 2025 19:29 IST

पावसाचे सर्वत्र धुमशान : यावेळी पूर्वसाेबत पश्चिम विदर्भही चिंब

नागपूर : एक ऑगस्टपासून माेठा खंड घेतल्यानंतर बुधवारी श्रावणसरींचे जाेरदार पुनरागमन झाले. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना चिंब भिजवतानाच यावेळी पश्चिम विदर्भातही धुवांधार हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ११० मि.मी. पावसाची नाेंद झाली, तर जुलैअखेर पर्यंत सरासरीपेक्षा बरेच मागे असलेल्या अमरावती व अकाेला जिल्ह्यालाही यावेळी दमदार पावसाने सुखावले.

जुलै महिन्यात दमदार बरसल्यामुळे विशेषत: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरीच्या पुढे झेप घेतली हाेती. नागपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यात २० ते ३० टक्के अधिक पावसाची नाेंद झाली हाेती. श्रावणाच्या आगमनाच्या दरम्यानही या जिल्ह्यांत पावसाचे धुमशान चालले हाेते. ऑगस्ट सुरू झाल्यापासून मात्र आकाशातून ढगांची गर्दी हटली. दहा-बारा दिवसाचा खंड पडल्यामुळे पावसाचे आकडे सरासरीच्या खाली आले. दुसरीकडे पश्चिम विदर्भात श्रावण सुरू झाल्यापासूनच पाऊस थांबला हाेता. अमरावती व अकाेल्यात सरासरीपेक्षा ३० ते ३० टक्के कमी पाऊस झाला हाेता. यवतमाळ, वाशिम, बुलढाणासुद्धा पिछाडले हाेते. त्यामुळे या भागात नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती.

हवामान विभागाने १२ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरला. मंगळवारी किरकाेळ हजेरी लावल्यानंतर बुधवारी पावसाची तीव्रता चांगलीच वाढली. अमरावतीत सकाळी ८.३० पासून १२ तासात ९६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळलाही पावसाने धुवांधार बॅटिंग करीत ७२ मि.मी. नाेंद केली. अकाेल्यात संथगती सरी दिवसभर हाेत्या व १८ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. वर्धा जिल्ह्यात पहाटेपासून चांगलेच झाेडपले. येथे २४ तासात १२७.२ मि.मी. पाऊस झाला.

पश्चिम विदर्भात पावसाने जाेरदार पुनरागमन केले. चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा तडाखा सुरू झाला, जाे दिवसाही तीव्र हाेता. येथे सकाळी ८.३० पर्यंत ८६ मि.मी., तर सायंकाळी ५.३० पर्यंत ५३ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. भंडाऱ्यात दिवसभर जाेरदार सरी बरसल्या व ४३ मि.मी.ची नाेंद झाली. गडचिराेलीत रात्री बरसल्यानंतर दिवसभर ढग शांत राहिले. याशिवाय गाेंदियात २६ मि.मी., तर नागपूरला १८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमी झालेली सरासरी आता सामान्य झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस