शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

माेठा खंड पडल्यानंतर विदर्भात धुवांधार बरसल्या श्रावणसरी

By निशांत वानखेडे | Updated: August 13, 2025 19:29 IST

पावसाचे सर्वत्र धुमशान : यावेळी पूर्वसाेबत पश्चिम विदर्भही चिंब

नागपूर : एक ऑगस्टपासून माेठा खंड घेतल्यानंतर बुधवारी श्रावणसरींचे जाेरदार पुनरागमन झाले. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना चिंब भिजवतानाच यावेळी पश्चिम विदर्भातही धुवांधार हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ११० मि.मी. पावसाची नाेंद झाली, तर जुलैअखेर पर्यंत सरासरीपेक्षा बरेच मागे असलेल्या अमरावती व अकाेला जिल्ह्यालाही यावेळी दमदार पावसाने सुखावले.

जुलै महिन्यात दमदार बरसल्यामुळे विशेषत: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरीच्या पुढे झेप घेतली हाेती. नागपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यात २० ते ३० टक्के अधिक पावसाची नाेंद झाली हाेती. श्रावणाच्या आगमनाच्या दरम्यानही या जिल्ह्यांत पावसाचे धुमशान चालले हाेते. ऑगस्ट सुरू झाल्यापासून मात्र आकाशातून ढगांची गर्दी हटली. दहा-बारा दिवसाचा खंड पडल्यामुळे पावसाचे आकडे सरासरीच्या खाली आले. दुसरीकडे पश्चिम विदर्भात श्रावण सुरू झाल्यापासूनच पाऊस थांबला हाेता. अमरावती व अकाेल्यात सरासरीपेक्षा ३० ते ३० टक्के कमी पाऊस झाला हाेता. यवतमाळ, वाशिम, बुलढाणासुद्धा पिछाडले हाेते. त्यामुळे या भागात नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती.

हवामान विभागाने १२ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरला. मंगळवारी किरकाेळ हजेरी लावल्यानंतर बुधवारी पावसाची तीव्रता चांगलीच वाढली. अमरावतीत सकाळी ८.३० पासून १२ तासात ९६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळलाही पावसाने धुवांधार बॅटिंग करीत ७२ मि.मी. नाेंद केली. अकाेल्यात संथगती सरी दिवसभर हाेत्या व १८ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. वर्धा जिल्ह्यात पहाटेपासून चांगलेच झाेडपले. येथे २४ तासात १२७.२ मि.मी. पाऊस झाला.

पश्चिम विदर्भात पावसाने जाेरदार पुनरागमन केले. चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा तडाखा सुरू झाला, जाे दिवसाही तीव्र हाेता. येथे सकाळी ८.३० पर्यंत ८६ मि.मी., तर सायंकाळी ५.३० पर्यंत ५३ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. भंडाऱ्यात दिवसभर जाेरदार सरी बरसल्या व ४३ मि.मी.ची नाेंद झाली. गडचिराेलीत रात्री बरसल्यानंतर दिवसभर ढग शांत राहिले. याशिवाय गाेंदियात २६ मि.मी., तर नागपूरला १८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमी झालेली सरासरी आता सामान्य झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस