शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तब्बल नऊ वर्षांनंतर नागपूर विमानतळ खासगीकरणाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ खासगी कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) माध्यमातून राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२८ ला वित्तीय निविदा काढणार : निविदेसाठी पाच कंपन्या पात्र, सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ खासगी कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) माध्यमातून राबविण्यात येत आहे.जून २००६ मध्ये संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेडची नोंदणी झाली आणि आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएलने विमानतळ संचालनाची जबाबदारी सांभाळली. जवळपास आठ वर्षांनंतर गेल्या वर्षी आरएफक्यू (रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन) निविदा काढण्यात आल्या. पूर्व प्रक्रियेत पात्र भागीदारांमध्ये जीव्हीके, जीएमआर, टाटा रियल्टी, एस्सेल इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा आदी कंपन्यांचा समावेश आहे. विमानतळाचा ताबा कुणाला मिळेल, हे निविदा काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.यापूर्वी विमानतळाच्या खासगीकरणासाठी अनेक प्रक्रिया झाल्या आहेत. २००९ मध्ये नागपूर विमानतळ एएआयकडून एमएडीसीकडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत विमानतळाचे खासगीकरण अडकले होते. नवीन सरकार आल्यानंतरही या प्रक्रियेला साडेचार वर्षे लागली. विमानतळ विकासासाठी निवड झालेली संबंधित कंपनी आणि एमआयएल यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. १६८५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात निवड झालेल्या संबंधित कंपनीचे ७४ टक्के आणि एमआयएलची २६ टक्के भागीदारी राहील. खासगीकरणानंतर नागपूर विमानतळ सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर उभारण्याची योजना असून, त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या विमानतळावर जवळपास २० विमाने राहण्याची क्षमता आहे. विकासानंतर त्याची क्षमता वाढणार आहे.अशी होतील विकास कामे 

  •  ७४ टक्के भागीदारीसह विमानतळाच्या विकासासाठी १६८५ कोटींची गुंतवणूक.
  •  दुसऱ्या धावपट्टीची उभारणी. पहिल्या टप्प्यात ३२०० मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात ८०० मीटर वाढवून धावपट्टीची एकूण लांबी ४ हजार मीटर.
  •  नवीन धावपट्टीवर जगातील सर्वात मोठ्या ए-३०० या प्रवासी विमानाचे लॅण्डिंग.
  •  ६५ हजार चौरस फूट जागेत नवीन टर्मिनल बिल्डिंग, १६ नवीन पार्किंग बेज व अ‍ॅप्रॉन.
  •  नवीन एटीसी ब्लॉक, फायर स्टेशन आणि कार्गो इमारत.

निविदेनंतर प्रक्रियेला एक महिना लागणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाला निविदा काढल्यानंतर आणखी एक महिना लागणार आहे. २८ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या वित्तीय निविदेतून खासगीकरणाची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हे निश्चित होणार आहे. पाच कंपन्या २८ रोजी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या वित्तीय निविदा एमआयएलच्या कार्यालयात सादर करणार आहे. त्याच दिवशी निविदा काढून सल्लागारांमार्फत छाननी होणार आहे. विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. त्यानंतरची प्रक्रिया किमान एक महिना चालणार आहे. त्यानंतरच विमानतळ विकासाची सूत्रे पात्र कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे.विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर