शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

तब्बल नऊ वर्षांनंतर नागपूर विमानतळ खासगीकरणाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ खासगी कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) माध्यमातून राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२८ ला वित्तीय निविदा काढणार : निविदेसाठी पाच कंपन्या पात्र, सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ खासगी कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) माध्यमातून राबविण्यात येत आहे.जून २००६ मध्ये संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेडची नोंदणी झाली आणि आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएलने विमानतळ संचालनाची जबाबदारी सांभाळली. जवळपास आठ वर्षांनंतर गेल्या वर्षी आरएफक्यू (रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन) निविदा काढण्यात आल्या. पूर्व प्रक्रियेत पात्र भागीदारांमध्ये जीव्हीके, जीएमआर, टाटा रियल्टी, एस्सेल इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा आदी कंपन्यांचा समावेश आहे. विमानतळाचा ताबा कुणाला मिळेल, हे निविदा काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.यापूर्वी विमानतळाच्या खासगीकरणासाठी अनेक प्रक्रिया झाल्या आहेत. २००९ मध्ये नागपूर विमानतळ एएआयकडून एमएडीसीकडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत विमानतळाचे खासगीकरण अडकले होते. नवीन सरकार आल्यानंतरही या प्रक्रियेला साडेचार वर्षे लागली. विमानतळ विकासासाठी निवड झालेली संबंधित कंपनी आणि एमआयएल यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. १६८५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात निवड झालेल्या संबंधित कंपनीचे ७४ टक्के आणि एमआयएलची २६ टक्के भागीदारी राहील. खासगीकरणानंतर नागपूर विमानतळ सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर उभारण्याची योजना असून, त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या विमानतळावर जवळपास २० विमाने राहण्याची क्षमता आहे. विकासानंतर त्याची क्षमता वाढणार आहे.अशी होतील विकास कामे 

  •  ७४ टक्के भागीदारीसह विमानतळाच्या विकासासाठी १६८५ कोटींची गुंतवणूक.
  •  दुसऱ्या धावपट्टीची उभारणी. पहिल्या टप्प्यात ३२०० मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात ८०० मीटर वाढवून धावपट्टीची एकूण लांबी ४ हजार मीटर.
  •  नवीन धावपट्टीवर जगातील सर्वात मोठ्या ए-३०० या प्रवासी विमानाचे लॅण्डिंग.
  •  ६५ हजार चौरस फूट जागेत नवीन टर्मिनल बिल्डिंग, १६ नवीन पार्किंग बेज व अ‍ॅप्रॉन.
  •  नवीन एटीसी ब्लॉक, फायर स्टेशन आणि कार्गो इमारत.

निविदेनंतर प्रक्रियेला एक महिना लागणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाला निविदा काढल्यानंतर आणखी एक महिना लागणार आहे. २८ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या वित्तीय निविदेतून खासगीकरणाची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हे निश्चित होणार आहे. पाच कंपन्या २८ रोजी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या वित्तीय निविदा एमआयएलच्या कार्यालयात सादर करणार आहे. त्याच दिवशी निविदा काढून सल्लागारांमार्फत छाननी होणार आहे. विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. त्यानंतरची प्रक्रिया किमान एक महिना चालणार आहे. त्यानंतरच विमानतळ विकासाची सूत्रे पात्र कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे.विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर