शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

नेहरू, इंदिरांनंतर आता भाजप नेत्यांचे संजय गांधींवर टीकास्त्र

By योगेश पांडे | Updated: June 20, 2025 15:52 IST

आणीबाणीत मनमानी केल्याचा आरोप : भाजप मिसाबंदींचा करणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून भाजप नेत्यांकडून सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यात येत आहेत. मात्र आता भाजप नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्यवरदेखील टीकास्त्र सोडले आहे. आणीबाणीच्या कालावधीत संजय गांधी व त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी देशात दहशत निर्माण करून मनमानीचा कारभार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास व नागपुरचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लावला.

शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. १९७५ मध्ये देशात लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होतील. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या हजारो लोकांना तुरुंगात टाकले होते, ज्यात विरोधी पक्षाचे नेतेही होते. आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. यात संजय गांधी यांची मोठी भूमिका होती. त्यांनी जबरदस्तीने देशातील अनेक अविवाहित तरुणांचीदेखील नसबंदी केली होती. कॉंग्रेसचे नेते आता संविधान बचावची भाषा करतात. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेस पक्षानेच आणीबाणीच्या काळात संविधानाची गळचेपी करण्याचे काम केले होते. नवीन पिढीपर्यंत कॉंग्रेसचा हा खरा चेहरा व आणीबाणीची दाहकता आणण्यावर आमचा भर असेल असेल तिवारी यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून २५ जून रोजी आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या मिसाबंदींचा सन्मान केला जाईल. हा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाची स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, मिलींद माने, विकास कुंभारे, अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाRajiv Gandhiराजीव गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूnagpurनागपूर