शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

लवादाच्या निर्णयानंतर ग्राहक मंचमध्ये तक्रार अस्वीकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:06 AM

लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देग्राहक मंचचा निर्णयलवादाचा निर्णय पक्षकारांना बंधनकारक असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दिला.संबंधित प्रकरणावर मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जाफर अहमद सय्यद व टाटा मोटर्स फायनान्स यांच्यामधील कर्ज करारानुसार कर्जाचा वाद निकाली काढण्यासाठी लवाद प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला होता. लवादाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर सय्यद यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने वरीलप्रमाणे निर्णय देऊन त्यांची तक्रार फेटाळून लावली. तक्रारीनुसार, सय्यद यांनी वाहन खरेदी करण्यासाठी टाटा मोटर्सकडून ३ लाख ९२ हजार रुपये कर्ज घेतले होते. ८९ हजार रुपये स्वत:जवळचे दिले होते. करारानुसार, कर्जाची रक्कम ११ एप्रिल २०१६ पर्यंत ४७ मासिक हप्त्यामध्ये परत करायची होती. सय्यद यांनी २३ सप्टेंबर २०१५ पर्यंत ४ लाख ६६ हजार ३५३ रुपये परत केले. त्यानंतर कर्जाचे केवळ ४५ हजार ९६७ रुपये शिल्लक असताना कंपनीने ११ डिसेंबर २०१५ रोजी वाहन जप्त केले. परिणामी, सय्यद यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली, पण कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. तसेच, सय्यद यांना कर्जाची रक्कम व वाहन यापैकी काहीही दिले नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल करून कर्जाची रक्कम, भरपाई इत्यादीसह एकूण ९ लाख ५५ हजार ३५३ रुपयाची मागणी केली होती.असे होते कंपनीचे उत्तरकंपनीने मंचमध्ये लेखी उत्तर दाखल करून सय्यद यांचे सर्व आरोप फेटाळून लावले व विविध मुद्यांच्या आधारे स्वत:च्या कारवाईचे समर्थन केले. कर्ज करारानुसार हे प्रकरण आधी लवादापुढे ठेवण्यात आले होते. लवादाने कंपनीला वाहनाचा ताबा घेण्याची परवानगी दिली होती. तसेच, सय्यद यांनी २ लाख १५ हजार ८७४ रुपये १८ टक्के व्याजासह कंपनीला अदा करावे असा अंतिम आदेश दिला. सय्यद यांनी ही बाब मंचपासून लपवून ठेवली असे कंपनीने सांगितले.

टॅग्स :consumerग्राहक