शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘लॉकडाऊन’चा फायदा, वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:08 IST

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले परिणामदेखील दिसायला लागले आहे. या कालावधीत दळणवळण यंत्रणा, उद्योग बंद होते व त्यामुळे वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटल्याचे आढळून आले.

ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’तील प्राध्यापकांचे संशोधन : देशभरातील प्रदूषणात घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले परिणामदेखील दिसायला लागले आहे. या कालावधीत दळणवळण यंत्रणा, उद्योग बंद होते व त्यामुळे वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटल्याचे आढळून आले. विशेषत: देशातील उत्तर, मध्य व दक्षिण भारतात यामुळे प्रदूषणात घट झाल्याची बाब समोर आली आहे. ‘व्हीएनआयटी’तील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) संशोधनातून ‘लॉकडाऊन’ काळात वातावरणातील प्रभावाची आकडेवारी दिसून आली.‘व्हीएनआयटी’तील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर डॉ.यशवंत काटपातळ, ‘एमटेक’चे विद्यार्थी विकास पटेल व प्रकाश टाकसाळ यांनी हे संशोधन केले. ‘नासा’च्या तीन उपग्रहांकडून मिळालेल्या ‘डाटा’च्या आधारावर वातावरणातील ‘एरोसोल’ची खोली व प्रमाण यांचा अभ्यास केला. २०१६ ते २०१९ या वर्षांत २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण जास्त होते. यंदा हे प्रमाण फारच कमी होते. जेव्हा वातावरणात ‘एओडी’ (एरोसोल आॅप्टिकल डेप्थ) कमी असते तेव्हा ‘एरोसोल’चे प्रमाणदेखील घटलेले दिसून येते. संशोधकांनी या कालावधीतील ‘एओडी’ व ‘एआय’ (एरोसोल इंडेक्स) दोघांचीही तुलना केली.‘लॉकडाऊन’च्या कालावधीत राजस्थान, उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत व मध्य भारतात ‘एओडी’चे प्रमाण कमी होते. मात्र पश्चिम भारतात फारसा फरक आढळून आला नाही. प्रदूषित भागातील एरोसोलचे प्रमाण पहिल्यांदा असे कमी झाल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. दुसरीकडे ‘एआय’चा संबंध हा थेट वायूप्रदूषणासोबत असतो. उत्तर भारत व मध्य भारतात ‘एआय’चे प्रमाण कमी होते. मानवनिर्मित हस्तक्षेप कमी असल्यास एरोसोलच्या प्रमाणात अशी घट राहू शकते, असा निष्कर्ष यातून समोर असल्याचे संशोधकांनी सांगितले.‘एरोसोल’ म्हणजे काय ?वायुप्रदूषणाशी ‘एरोसोल’चा संबंध असतो. यात लहान थेंब, धुळीचे लहान कण, ब्लॅक कार्बनचे सूक्ष्म कण, वायुप्रदूषण करणारे वायू इत्यादींचा समावेश असतो. ‘एरोसोल’ हे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. धुके, गिझर स्टीम, ज्वालामुखीय धूळ ही नैसर्गिक ‘एरोसोल’ची उदाहरणे आहेत तर धुके, धूळ, वायु प्रदूषण करणारे कण, धूर हे मानवनिर्मित असतात. ‘एरोसोल’चे ‘एआय’ किंवा ‘एओडी’चे प्रमाण वाढले तर प्रदूषणात वाढ होते.

टॅग्स :scienceविज्ञानResearchसंशोधन