सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी कठीण जाईल राज्य शिक्षण मंडळात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:43+5:302021-04-18T04:07:43+5:30
आशीष दुबे नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय घेतला. या ...

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी कठीण जाईल राज्य शिक्षण मंडळात प्रवेश
आशीष दुबे
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना अकरावीत राज्य शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
सीबीएसईच्या निर्णयानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने कुठलेही धोरण ठरविले नसल्याचे प्रतिक्रिया दिली आहे. आहे त्याच धोरणानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या संबंधित महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश देण्यात येईल. बोर्डाची परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात येणार नाही. सध्या २९ एप्रिलपासून सुरू होणारी दहावीची परीक्षा स्थगित केली आहे. हेसुद्धा स्पष्ट केले की परीक्षा जून महिन्यात घेतली जाईल.
सीबीएसईचे दहावीचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अकरावीत राज्य शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. नागपुरात अशा विद्यार्थ्यांची संख्या ९६ टक्के आहे. त्यामागचे एक कारण असेही आहे की सीबीएसईच्या तुलनेत राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम सोपा आहे. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक वेळ मिळावा म्हणून या महाविद्यालयांमध्ये अकरावीपासूनच विद्यार्थ्यांना सूट दिली जाते. ही सूट सीबीएसई महाविद्यालयात मिळत नाही.
- धोरण स्पष्ट करणे गरजेचे
यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सीबीएसईचा निर्णय येऊन दोन दिवस झाले आहे. राज्य सरकार व राज्य शिक्षण मंडळाला अकरावीच्या प्रवेशाचे धोरण स्पष्ट करणे गरजेचे आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित शहरातील महाविद्यालयात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश होतात. धोरण स्पष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना निर्णय घेणे सोपे होईल. यात जेवढा वेळ होईल, तेवढा विद्यार्थी व पालकांचा तणाव वाढेल.