अ...‘अ‍ॅडमिशन’चा!

By Admin | Updated: June 9, 2016 02:14 IST2016-06-09T02:14:09+5:302016-06-09T02:14:09+5:30

दहावी-बारावीच्या परीक्षानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते प्रवेशाचे. नामवंत महाविद्यालय व आपल्या

A 'Admision'! | अ...‘अ‍ॅडमिशन’चा!

अ...‘अ‍ॅडमिशन’चा!

नागपूर : दहावी-बारावीच्या परीक्षानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते प्रवेशाचे. नामवंत महाविद्यालय व आपल्या मनासारख्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा ही विद्यार्थ्यांची इच्छा असते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅडमिशन’च्या अग्निदिव्यातून जावे लागते. ‘आॅनलाईन’मुळे प्रक्रिया सोपी झाली असली तरी विद्यार्थ्यांच्या मनातील धाकधूक मात्र तीच आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. उपराजधानीतील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तर काहींची सुरू होणार आहे. एकूणच हा आठवडा उपराजधानीतील बहुतांश विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा म्हणता येईल. कुठलाही संभ्रम असेल तर विद्यार्थ्यांनी थेट संबंधित प्रक्रियेच्या संकेतस्थळावरून शंका दूर करावी अन्यथा अधिकाऱ्यांशी भेटून अडचण मांडावी.

अभियांत्रिकी महाविद्यालये होणार ‘हाऊसफुल्ल’
यंदा मात्र अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. ‘एमएचटी-सीईटी’मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नागपूर विभागातून सुमारे २४ हजार जागांसाठी ३२ हजार ६०० विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे प्रवेशाचा दुष्काळ दूर होऊन यंदा अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश ‘हाऊसफुल्ल’ होण्याची चिन्हे आहेत. /पान ७

३ दिवसांत १२ हजार अर्जांची विक्री
अकरावी प्रवेशासाठी शहरातील निरनिराळ्या केंद्रांवर होणाऱ्या अर्जविक्रीला विद्यार्थ्यांचा तूफान प्रतिसाद मिळत असून याचा आकडा तीनच दिवसांत १२ हजारांवर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य व कला शाखेपेक्षा विज्ञानकडे जास्त असल्याचेदेखील दिसून येत आहे. अर्ज भरण्यासंदर्भातदेखील विद्यार्थ्यांची लगबग दिसून आली. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी योग्य काळजी घेऊन अर्ज भरावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश समितीतर्फे करण्यात आले आहे./पान ७

‘पॉलिटेक्निक’चे प्रवेश गुणवत्तेनुसार
दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहे. दहावीनंतर ‘पॉलिटेक्निक’कडेदेखील अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असतो व काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयांत प्रवेशदेखील घेतात. परंतु यंदा संस्थास्तरावरील प्रवेशासाठीदेखील विद्यार्थ्यांचे नाव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तयार केलेल्या गुणवत्ता यादीत असणे आवश्यक आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रकच जारी केले आहे. /पान ५

Web Title: A 'Admision'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.