शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

नागपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास प्रशासकीय अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:24 IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची भावना लक्षात घेऊन, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अनेक अडचणी आहे. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तरतुदी आणि निकष विचारात घेता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अडचणी येणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार होते दुष्काळाचे मापनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाताळली जाते यंत्रणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची भावना लक्षात घेऊन, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अनेक अडचणी आहे. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तरतुदी आणि निकष विचारात घेता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अडचणी येणार आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळी परिस्थितीचे तीन इंडेक्समध्ये ठरविण्यात आले आहे. यात एनडीव्हीआय, एनडीडब्ल्यूआय हा एक इन्डेक्स असतो. त्याचबरोबर वनस्पती स्थिती निर्देशांक (व्हीसीआय) व आर्द्रता पुरेशीपणा निर्देशांक (मॉस्चर अ‍ॅडेक्वेसी इन्डेक्स) या तीन घटकाचा विचार करून दुष्काळसदृश परिस्थिती निश्चित करण्यात येते. या तिन्ही इंडेक्ससाठी ही आकडेवारी लागते, ती आकडेवारी कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महसूल विभागाकडून गोळा करावी लागते. गोळ्या झालेल्या तिन्ही आकडेवारीचे अवलोकन करून, ठरवून दिलेल्या निकषानुसार मध्यम दुष्काळ, गंभीर दुष्काळ ठरविण्यात येतो. या तिन्ही इन्डेक्सची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर गोळा करून, शासनाकडे पाठविली जाते.दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे जिल्हास्तीरय विभाग प्रमुख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर येथील तज्ञ व्यक्ती, जिल्हा कृषी अधीक्षक व सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी असतात. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून यंत्रणा हाताळली जाते.दुष्काळ घोषित करण्यापूर्वी परिसरातील पर्जन्यमान, जमिनीची आर्द्रता व वनस्पतीच्या स्थितीचे अवलोकन केले जाते. नागपूर जिल्ह्यात शासनाने कळमेश्वर, नरखेड व काटोल तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित केले. परंतु अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही भागात असल्याची ओरड सदस्यांनी केली होती. त्यामुळे जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती.दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार तालुके जरी दुष्काळाच्या तीव्रतेत येत नसल्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळाचा जून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान झालेल्या कालावधीत पर्जन्यमानाचे अवलोकन करून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. यात नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर तालुक्यातील गोधनी, हिंगणा तालुक्यातील आडेगाव, टाकळघाट, रामटेक तालुक्यातील देवलापार, उमरेड तालुक्यातील मकरधोकडा, हेवती व पाचगाव तर कुही तालुक्यातील मांढळचा समावेश करण्यात आला आहे. राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रति मानसिकता असावीदुष्काळी व्यवस्थापनाची संहिता काहीही असो, पण ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. शेतकऱ्यांच्या हातात यंदा २ क्विंटलही कापूस येईल की नाही, याची शाश्वती नाही. राजकारण्यांनी जिल्ह्याचे अवलोकन करून, परिस्थिती जाणून घेतल्यास दुष्काळ घोषित करू शकतात. त्यासाठी राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रति मानसिकता असणे गरजेचे आहे.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि.प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरdroughtदुष्काळ