शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास प्रशासकीय अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:24 IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची भावना लक्षात घेऊन, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अनेक अडचणी आहे. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तरतुदी आणि निकष विचारात घेता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अडचणी येणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार होते दुष्काळाचे मापनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाताळली जाते यंत्रणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची भावना लक्षात घेऊन, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अनेक अडचणी आहे. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तरतुदी आणि निकष विचारात घेता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यास अडचणी येणार आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळी परिस्थितीचे तीन इंडेक्समध्ये ठरविण्यात आले आहे. यात एनडीव्हीआय, एनडीडब्ल्यूआय हा एक इन्डेक्स असतो. त्याचबरोबर वनस्पती स्थिती निर्देशांक (व्हीसीआय) व आर्द्रता पुरेशीपणा निर्देशांक (मॉस्चर अ‍ॅडेक्वेसी इन्डेक्स) या तीन घटकाचा विचार करून दुष्काळसदृश परिस्थिती निश्चित करण्यात येते. या तिन्ही इंडेक्ससाठी ही आकडेवारी लागते, ती आकडेवारी कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महसूल विभागाकडून गोळा करावी लागते. गोळ्या झालेल्या तिन्ही आकडेवारीचे अवलोकन करून, ठरवून दिलेल्या निकषानुसार मध्यम दुष्काळ, गंभीर दुष्काळ ठरविण्यात येतो. या तिन्ही इन्डेक्सची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर गोळा करून, शासनाकडे पाठविली जाते.दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे जिल्हास्तीरय विभाग प्रमुख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर येथील तज्ञ व्यक्ती, जिल्हा कृषी अधीक्षक व सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी असतात. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून यंत्रणा हाताळली जाते.दुष्काळ घोषित करण्यापूर्वी परिसरातील पर्जन्यमान, जमिनीची आर्द्रता व वनस्पतीच्या स्थितीचे अवलोकन केले जाते. नागपूर जिल्ह्यात शासनाने कळमेश्वर, नरखेड व काटोल तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित केले. परंतु अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही भागात असल्याची ओरड सदस्यांनी केली होती. त्यामुळे जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती.दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार तालुके जरी दुष्काळाच्या तीव्रतेत येत नसल्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळाचा जून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान झालेल्या कालावधीत पर्जन्यमानाचे अवलोकन करून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. यात नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर तालुक्यातील गोधनी, हिंगणा तालुक्यातील आडेगाव, टाकळघाट, रामटेक तालुक्यातील देवलापार, उमरेड तालुक्यातील मकरधोकडा, हेवती व पाचगाव तर कुही तालुक्यातील मांढळचा समावेश करण्यात आला आहे. राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रति मानसिकता असावीदुष्काळी व्यवस्थापनाची संहिता काहीही असो, पण ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. शेतकऱ्यांच्या हातात यंदा २ क्विंटलही कापूस येईल की नाही, याची शाश्वती नाही. राजकारण्यांनी जिल्ह्याचे अवलोकन करून, परिस्थिती जाणून घेतल्यास दुष्काळ घोषित करू शकतात. त्यासाठी राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रति मानसिकता असणे गरजेचे आहे.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि.प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरdroughtदुष्काळ