शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 8:55 PM

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देआचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज : २१,९७० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले की, जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. या १२ ही ठिकाणी मतदान व मतमोजणी होईल. निवडणुकीच्या कामासाठी एकूण २१९७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ते सर्व उपलब्ध आहेत. यासोबतच ४३८२ अधिकारी-कर्मचारी हे रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त यासर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाºयांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. २७ तारखेपर्यंत ते चालणार आहे. दक्षता पथकही तयार करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात चार दक्षता पथक नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक पथकात चार ते पाच कर्मचाºयांचा समावेश राहिल. तसेच कॅमेरा आणि सांख्यिकी पथकसुद्धा असेल. मध्य प्रदेशातील दोन जिल्हे लागून आहे. या जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची तस्करी होता कामा नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, शिरिष पांडे आदी उपस्थित होते.५५ संवेदनशील मतदान केंद्रनिवडणुकीसाठी ४४१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून यातील ५५ केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदार केंद्रावरून सीसीटीव्ही लावण्यात येणार असून अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेब कास्टींग करण्यात येणार आहे.लोकसभेच्या तुलनेत ३० मतदान केंद्र अधिक आहेत. एका विधानसभा संघात एक केंद्र विशेष महिलांचे असणार आहे.७७२१ बॅलेट युनिटची गरजनिवडणुकीकरता ७७२१बॅलेट युनिट तर ५५१५कंट्रोल युनिट आवश्यक आहे. प्रशासनाकडे ८१८०बॅलेट युनिट आणि ८८८३ कंट्रोल युनिट आहेत. ५९५६ व्हीव्हीपॅट मशीन असून १०३ मशीन कमी आहेत. आंध्र प्रदेशकडून २८० व्हीव्हीपॅट मशीन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुद्गल यांनी सांगितले.८९०२ पोलिंग एजंट राजकीय पक्षाकडून नियुक्तराजकीय पक्षांकडून ८९०२ पोलिंग एजंटची नियुक्ती केली आहे. यात सर्वाधिक ४२१६ एजंटची नियुक्ती भाजपने केली आहे. तर ३४३४ कॉंग्रेस, बसपने २०० तर सेनाने ४४७ एजंटची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ७८ हजार मतदार वाढले

 लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्ह्यात तब्बल ७८ हजार ५७५ मतदार वाढले आहेत. यामध्ये तब्बल ७३९३६ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील म्हणजे नवमतदार आहेत. यातही महिला मतदारांची संख्या अधिक आहे, हे विशेष.  जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  गेल्या ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या यादीत जिल्ह्यात ४१ लाख ६३ हजार ३६७ मतदार आहे. यात पुरुष २१ लाख ३१ हजार १४९, महिला २० लाख ३२ हजार ११८ व १०० तृतिय पंथीय मतदात्यांचा समावेश आहे.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विशेष मोहिमेंतर्गत मतदारांची भर पडली असून ७८ हजार ५२५ नवमतदार वाढले आहे. त्यात ३६ हजार ४०९ पुरुष व ४२ हजार ११२ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील ६३ हजारांनी मतदार वाढले असून यंदाच्या विधानसभेत ७३ हजार ९३६ नवमतदारांचा समावेश आहे. त्यांना आकर्षित करण्यावर विशेष भर राजकीय पक्षांचा राहणार आहे. ८ हजार ८३७ मतदार वगळलेलोकसभा निवडणुकीनंतर ८ हजार ८३७ मतदार वगळण्यात आले. त्यात ५ हजार ७०८ मृत असून १ हजार ४५३ स्थलांतरित व ८७६ डुप्लिकेट मतदार आढळून आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरMediaमाध्यमे