शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

नागपूर जिल्ह्यात चार वर्षांत २७८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 20:27 IST

गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसानुग्रह अनुदान योजनेंतर्गत दोन कोटीची भरपाई : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अपघातामुळे विद्यार्थ्यांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्यासाठी राज्य सरकार राजीव गांधी विद्यार्थीअपघात सानुग्रह योजना राबवीत आहे. गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे.वर्ग १ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते. पूर्वी ही योजना विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. परंतु विमा कंपन्यांच्या वर्तनाबद्दल शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विमा कंपन्या विविध कारणे सांगून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत होती. विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली लागत नसल्यामुळे, विमा कंपन्यांमार्फत योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना २०१२-१३ पासून राबविण्यात आली. संर्पदंश, विषबाधा, विजेचा शॉक, अपघात आदीमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याला ७५,००० रुपये भरपाई देण्यात येते. अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास ५०,००० व एक डोळा एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपये भरपाई देण्यात येते. योजनेची भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी माध्यमिक हे सदस्य आहेत, तर शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सदस्य सचिव आहेत. विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व शाळेच्या मुख्याध्यापकांची आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षात २७८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यांच्या नुकसान भरपाईपोटी २ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वर्षनिहाय नुकसान भरपाईवर्ष                विद्यार्थी संख्या           नुकसान भरपाई२०१४-१५     ६५                          ४४,२५,०००२०१५-१६     ६२                          ४६,५०,०००२०१७-१८     ४८                         ३६,००,०००२०१८-१९     १०३                       ७७,२५,०००

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू