शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

६३ हजारावर ग्राहकांचे एप्रिलपासून वीजबिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:49 IST

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० हजार ६२३ रुपये असून या ग्राहकांविरोधात महावितरणतर्फे मोहीम राबवण्यात येणार असून कठोर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल दिले आहेत.

ठळक मुद्दे५१ कोटींच्या थकबाकी :वसुलीसाठी महावितरणची कठोर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० हजार ६२३ रुपये असून या ग्राहकांविरोधात महावितरणतर्फे मोहीम राबवण्यात येणार असून कठोर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल दिले आहेत.वीज बिलांची थकबाकी असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून सातत्याने करण्यात येते मात्र सध्या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने आणि अनेक महिने वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या वाढल्याने महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरू करण्यात आला आहे. वीज ग्राहकांकडे महावितरणच्या मासिक बिलाचा एक रुपयाही थकीत राहणार नाही, या ध्येयाने या मोहिमेमध्ये सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार वीज बिलाची वसुली आणि थकबाकीदारांविरुद्धच्या कारवाईला वेग आला आहे.एप्रिल २०१८ पासून वीजबिलांचा भरणा न केलेल्या ६३ हजार ६९८ ग्राहकांपैकी ५८ हजार ८२७ ग्राहकांकडे एक हजारापेक्षा अधिक रकमेची थकबाकी असून त्यांच्याकडील थकबाकीचा एकूण आकडा हा तब्बल ५१ कोटी ६३ लाख २४ हजार १०९ रुपयांचा आहे. थकबाकीदारांची ही यादी सर्व संबंधितांकडे देण्यात आली असून येत्या ३१ मार्चपर्यंत यापैकी अधिकाधिक रकमेची वसुली करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व क्षेत्रीय अभियंत्यांना देण्यात आले आहेत. यात अकोला जिल्ह्यातील ९ हजार ८७८ ग्राहकांनी, बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार २८१ ग्राहकांनी, वाशिम जिल्ह्यातील १५ हजार १७३ ग्राहकांनी, अमरावती जिल्ह्यातील ७ हजार ७६४ ग्राहकांनी तर यवतमाळ जिल्ह्यातील ८ हजार ५७८ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिलांचा भरणा केलेला नाही, म्हणजेच संपुर्ण विदर्भातील एकूण ६३ हजार ६९८ ग्राहकांपैकी पश्चिम विदर्भातील एकूण ५९ हजार ६७४ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिलांच भरणा केलेला नाही, त्यांचाकडील फेब्रुवारी २०१९ पर्यंतच्या थकबाकीची रक्कम ४६ कोटी ६२ लाख ९२ हजार ८३४ रुपये आहे.तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ३३९, गडचिरोली जिल्ह्यातील १०२७, भंडारा जिल्ह्यातील १२४, गोंदिया जिल्ह्यातील २२४, नागपूर जिल्ह्यातील १९७५ तर वर्धा जिल्ह्यातील ३३५ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिलांचा भरणा केलेला नाही. पूर्र्व विदर्भातील एकून ४०२४ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिला भरणा केलेला नसून त्यांचेकडील आजपर्यंतच्या थकबाकीची रक्कम ५ कोटी २८ लाख ३७ हजार ७८९ एवढी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल